शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

बाळ्या मामा आमचाच- जितेंद्र आव्हाडांच्या गौप्य स्फोटाने भिवंडीचे राजकारण ढवळले

By नितीन पंडित | Published: April 06, 2023 6:24 PM

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला.

भिवंडी:

दि.६-सध्या राज्यात विचित्र राजकीय परिस्थिती असून कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांना पक्षात आणले जात आहे.शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हा आमचाच होता,राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष होता, मात्र गोदामांवरील कारवाईची भीती दाखवून त्याच्यावर राष्ट्रवादी सोडण्याची वेळ आली. त्यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला.

आव्हाडांच्या या राजकीय गौप्य स्फोटाने भिवंडीतील राजकारण चांगलेच ढवळले आहे.आव्हाडांच्या या भाषणाची क्लिप भिवंडीत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.विशेष म्हणजे आव्हाडांच्या या वक्तव्याची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संदर्भात सुरेश म्हात्रे यांना विचारणा झाली असल्याची माहिती बाळ्या मामा यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.             शिवसेनेत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या व्यासपीठावरून आव्हाडांनी आपले मत व्यक्त करतांना कार्यकर्त्यांवर कशा प्रकारे दबाव आणला जातो,हे सांगताना शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचे उदाहरण दिले.बाळ्या मामा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते, भिवंडी लोकसभेचे खासदार व सध्या केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून बाळ्यामामा ओळखले जातात. भिवंडी लोकसभेत भाजपचे मंत्री असलेल्या पाटलांना लोकसभा निवडणुकीत केवळ बाळ्या मामा हे एकमेव विरोधक असल्याने बाळ्या मामा यांना शिंदे गटात घेतले तर भाजपसाठी ते फायदेशीर ठरणार यासाठी बाळ्या मामांवर दबाव आणला अशी चर्चा बाळ्या मामा यांच्या शिंदे गटात प्रवेश करताना जिल्हाभर झाली होती.त्यानंतर ठाणे येथील जाहीर सभेत आव्हाडांनी बाळ्या मामा यांच्यावरची कारवाई थांबावी म्हणून शरद पवार यांनी माझ्याकडेच निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यासाठी सांगितले असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.आव्हाडांच्या या गौप्यस्फोटामुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून आमचा बाळ्या मामा या आव्हाडांच्या विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे असल्याने मंत्री कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीतील राजकीय धोका अजूनही टळला नसल्याचे आव्हाडांच्या वक्तव्याने अधोरेखित झाले आहे.त्यामुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात आव्हाडांच्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.