शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भिवंडीत आदिवासी कातकरी कुटुंबातील दोन तरुणांना श्रमजीवी संघटनेने केले वेठबिगारीतून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:22 IST

मालकावर वेठबिगार व अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल 

भिवंडी: तालुक्यातील पाये , नाईकपाडा येथे राहणाऱ्या राजेश भोईर (24) व भिमा भोईर ( 22 ) या दोघा भावांना खार्डी गावातील निलेश तांगडी या मालकाने आपल्या सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात पिडीत तरुणांनी श्रमजिवी संघटनेच्या माध्यमातून तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989  कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

मालक निलेश तांगडी यांनी पिडीत तरुणांच्या 29 मे 2018 रोजी झालेल्या लग्न सोहळ्यासाठी 1 लाख 19 हजार 690 रुपये खर्च केला होता. त्याबाबत त्याने एका कागदावर लिहून दिले होते.त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनी दोघा भावांनी मालक निलेश तांगडी यांच्या मालकीच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्येकी 3 हजार 500 रुपये महिना वेतन देण्याचे निश्चित करून आठवड्याला प्रत्येकी 1 हजार रुपये दोघांना देण्याचे ठरवण्यात आले होते.तर दोघा भावांना घरी येण्या - जाण्यासाठी हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्तेही दर महिन्याला दोघांच्या पगारातून कपात केले जायचे.

कागदावर लग्नाचा खर्च लिहून दिल्यापासून दोन वर्षात आजपर्यंत दोघांचा हिशेब केलेला नव्हता.सर्व्हिस सेंटरवर काम नसले की मालक निलेश तांगडी त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा.सध्या कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. यावेळी निलेश तांगडी यांनी दोघा भावांना फोनवरून तसेच घरी येऊन आवणीच्या कामाला चला असा तगादा लावला होता. त्यावेळी घरच्या शेतीचे काम आटोपून आम्हीं कामावर येतो असे सांगितले.मात्र मालक निलेश हा काही ऐकत नव्हता.त्यामुळे दोघा भावांनी शेठ निलेश यास दोन वर्षे काम केल्याचा हिशोब करण्यास सांगितले.याचा राग मनात ठेवून निलेश तांगडी यांनी दोघा भावांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच माझे व्याजासहीत 3 लाख रुपये तुमच्या अंगावर झाले आहेत.ते एका महिन्यात मला परत द्या असे धमकावले.यामुळे राजेश व भिमा यांचे कुटुंब घाबरून अस्वस्थ झाले होते.अखेर या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांची भेट घेऊन त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला.पिडीत तरुणांच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन बाळाराम भोईर यांनी भिवंडी तालुक्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री उशिराने वेठबिगार मुक्ती व ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना दिली असता त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पिडीत राजेश व भीमा भोईर या दोघा भावांना कार्यालयात पाचारण करुन त्यांना वेठबिगार मुक्तीचे दाखले देऊन बंध मुक्त केले आहे.यावेळी भिवंडी शहराध्यक्ष सागर देसक,सचिव मोतीराम नामकुडा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे,ठाणे जिल्हा शेतकरी घटक प्रमुख संगिता भोमटे,ठाणे जिल्हा महिला घटक प्रमुख जया पारधी,भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनिल लोणे,भिवंडी ग्रामीण तालुका उपाध्यक्ष केशव पारधी, कातकरी घटक प्रमुख गुरुनाथ वाघे,भिवंडी शहर उपप्रमुख महेंद्र निरगुडा, युवक उपप्रमुख किशोर हुमणे आदी कार्यकर्ते  उपस्थित होते.या घटनेप्रकरणी मालक निलेश तांगडी याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989  कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास गणेशपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी