शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

भिवंडी ग्रामीण साठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारणार

By नितीन पंडित | Published: October 31, 2022 6:35 PM

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते.

भिवंडी, दि.३१- 

भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते. त्यामुळे ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी जोर धरत असतांना आता ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अग्निशामक दल उभारले जाणार असून त्यासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुध्दा लवकरच राबविली जाणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .केंद्रीय मंत्री पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला असून नियोजित केंद्रासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कपिल पाटील यांना दिली आहे.

 भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ३५ वर्षांपासून गोदामे वसली आहेत. जगभरातील नामांकित कंपन्यांबरोबरच हजारो कंपन्यांची गोदामे या ग्रामीण भागात आहेत. या गोदामांमध्ये मुंबई-ठाणे जिल्ह्यासाठी लागणाऱ्या मालाचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. मात्र, अनेक वेळा अचानक लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये गोदामे जळून भस्मसात होत आले आहेत.या गोदामांसाठी अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे भिवंडी,ठाणे,कल्याण,उल्हासनगर  महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत होते.मात्र काही वेळा त्यांना वाहतूक कोंडी मुळे घटनास्थळी पोहचण्यास विलंब होत असल्यामुळे गोदामांचे मोठे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी एमएमआरडीएकडे भिवंडी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली होती.त्यानंतर एमएमआरडीएने २०२० मध्ये अग्निशमन केंद्राला मान्यता दिली होती.परंतु कोरोनामुळे केंद्राच्या निर्मितीचा प्रस्ताव लांबला होता.आता कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर एमएमआरडीएने मुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिक्षक संवर्गासह इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे.या केंद्रामुळे भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात व गोदाम पट्ट्यात लागणाऱ्या आगी वेळीच आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.