शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

भिवंडीत मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा फेकून धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Published: August 28, 2023 2:54 PM

कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. मनपा प्रशासन कचरा उचलण्यास असमर्थ ठरली असल्याने शहरात घाण,दुर्गंधी व आजार वाढले असतांनाही मनपा प्रशासन कचरा ठेकेदारावर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप भिवंडी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आरफात खान यांनी करत थेट महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर सोमवारी कचरा फेकून धरणे आंदोलन केले. अचानक झालेल्या या कचरा फेको धरणे आंदोलनामुळे मनपा मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती.या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इसाम खान, जावेद खान, सलीम खान आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा सुमारे ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमलेला असताना सुद्धा शहरातील अनेक विभागात कचरा तसाच पडून आहे. कचरा न उचलताच कोट्यवधी रुपयांची बिल मंजूर केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी करत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

शहरातील अनेक भागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. शांतीनगर या अल्पसंख्याक विभागात पालिका प्रशासना दूजाभाव करीत असून गौसिया मस्जिद परिसरात कचरा उचलला जात नसल्याने पावसाळ्या मध्ये हा कचरा सडून त्या मधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या कचऱ्या मुळे काही संसर्ग आजारांची लागण सुध्दा नागरिकांना होते असल्याचा आरोप आरफात खान यांनी केला आहे.या बाबत पालिका प्रशासना कडे वेळोवेळी तक्रारी करून ही पालिका प्रशासन आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन हे आंदोलन केल्याची माहिती जावेद खान यांनी दिली आहे.सुमारे दोन तास सुरू राहिलेल्या या ठिय्या आंदोलनामुळे पालिका मुख्यालय प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर पालिका आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता विभागाचे प्रमुख जे एम सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यां सोबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी