शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 00:23 IST

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली.

- नितीन पंडित

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली. काँग्रेसचे तब्बल १८ नगरसेवक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर सौदेबाजी झाल्याचे उघडच आहे. नगरसेवकांच्या या सौदेबाजीमुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या नेतेमंडळींच्या ही हार मात्र चांगलीच जिव्हारी लागली आहे. एकहाती सत्ता असताना १८ नगरसेवक का फुटले? याचे चिंतन करण्याची वेळ काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आली आहे. नुसते महापौरपदच गमावले नसून काँग्रेसचे वर्चस्व आणि अस्तित्वही पणाला लागले आहे.

भिवंडी महापालिकेत ९० नगरसेवक आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. काँग्रेसचे नगरसेवक फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता २०१७ मध्ये शिवसेनेच्या १२ नगरसेवकांना सोबत घेऊन उपमहापौरपद शिवसेनेला दिले होते. तेव्हा काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर झाले होते. काँग्रेसची शहरावर एकहाती सत्ता असतानाही शहराची वाताहत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांवर जनतेचा रोष वाढला होता. त्यातच काँग्रेस पक्षश्रेष्ठींची महापालिकेत एकहाती हुकूमत होती. काँग्रेसचे अनेक नगरसेवक कर्जबाजारी असल्याने हीच संधी साधत कोणार्कच्या नेत्यांनी लाखो रुपयांची प्रलोभने दाखवून त्यांना आपल्याकडे खेचले. हा आकडा ३० लाखांच्या घरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी दोन व्हिप काढले. एका व्हिपद्वारे त्यांनी काँग्रेसच्या नगरसेविका रिषिका राका तर दुसऱ्या व्हिपमध्ये कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. हे व्हिप काही दैनिकांमध्ये मतदानाच्या दिवशीच प्रसिद्ध केले होते. या व्हिपच्या आधारेच आपण कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान केले असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांनी दिले आहे. तर दुसरीकडे आपण कोणार्कच्या बाजूने मतदान करण्याचा कोणताही व्हिप प्रसिद्ध केला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. एकंदरीतच आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोट्यवधींचा सौदा झाला हे उघड आहे.

भिवंडीचा राजकीय इतिहास पहिला तर मुस्लिमबहुल मतदार जास्त असल्याने येथे काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरात नुसते महापौरपद नाही तर आमदार, खासदार ही पदेही पडली आहेत. निवडून आलेला काँग्रेस नेता सत्ता आपली जहागिरी असल्याप्रमाणे वागत असल्याने ती टिकवणे वेळोवेळी कठीण झालेले आहे. तसेच जनकल्याणाऐवजी स्वत:च्या आर्थिक सुबत्तेकडेच लक्ष देत असल्याने त्याचा फटका पक्षाला स्थानिक पातळीवर बसत आहे. मुस्लिम मते ही काँग्रेसची हक्काची आहेत, ही वृत्ती मारक ठरत असून मतदार आता हुशार झाले आहेत आणि ही बदलती परिस्थिती काँग्रेसचे नेते मानायला तयार नाहीत. त्यामुळेच खासदार, आमदार या पदांबरोबरच आता महापौरपदही काँग्रेसला गमवावे लागले आहे.

अहंकार आणि सौदेबाजी यामुळे काँग्रेस रसातळाला गेली असून विधानसभा निवडणुकीत पूर्वेत समाजवादी पक्ष आणि पश्चिमेत एमआयएमने डोके वर काढले आहे. याचा फटका भविष्यात काँग्रेसला निश्चितच बसणार आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ सध्या समाजवादीच्या ताब्यात आहे, तर पश्चिम मतदारसंघ भाजपकडे आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकली जाते, यातच सर्वकाही आले. पश्चिममध्ये एमआयएमचा शेवटच्या क्षणाला निसटता पराभव झाला होता. याची जाण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना असती तर आर्थिक घोडेबाजाराला काँग्रेसला लगाम घालता आला असता. नगरसेवक फुटणे ही पक्षासाठी भविष्यातील धोक्याची घंटाच असून पक्षनेतृत्वाने ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीShiv Senaशिवसेना