शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:11 AM

दोन-तीन दिवसांपासून रिपरिप; हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती

जव्हार : जव्हार-मोखाडा तालुक्यांना काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले होते, तर मागील दोन ते तीन दिवसांपासून खेडोपाड्यात काही ठिकाणी पावसाच्या धारा पडत आहेत. यामुळे हळव्या वाणातील कापणी केलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. हातात आलेले पीक वाया जात असल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.हळव्या वाणातील भातपिके कापणीस तयार झाली आहेत. ठिकठिकाणी पिवळ्या सोन्यावाणी शेती बहरली आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीस सुरुवातही केली आहे. मात्र, कापणी केलेल्या या पिवळ्या सोन्याला घरी आणण्यापूर्वीच परतीच्या पावसाने दरोडा टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर कुजून जाताना पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.कोरोनाचा धोका पत्करून व टाळेबंदीचा सामना करून येथील शेतकºयांनी मोठ्या मेहनतीने या वर्षी भाताची लागवड केली आहे. अगदी सोन्यावाणी भात पिकून आले आहे. वेळीच या भाताची कापणी केली तर या भाताचा चांगला तांदूळ तयार करता येईल. अन्यथा जास्त दिवस शेतातच राहिले तर ते शेतात गळून जाईल, अशी भीती शेतकºयांना असल्याने शेतकºयांनी कापणी सुरू केली आहे.मात्र कापणी केलेल्या भाताचे कडपे रोजच संध्याकाळी कोसळत असलेल्या पावसाने भिजत आहेत. काही ठिकाणी कडपे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने कुजून जावून भाताच्या कणसांना मोड येऊ लागले आहेत.दरम्यान, आॅगस्ट महिन्यातही अतिवृष्टीमुळे जवळपास ३९७.३५ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले आहेत. या नुकसानीत भात १५७.६४ तर नागली २३९.७१ हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जव्हार तहसीलदार बाळा भला यांनीदिली आहे.