शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडी तालुक्यात दाखल; दुपारच्या जेवणाची महामार्गावर पंगत

By नितीन पंडित | Published: June 19, 2023 4:55 PM

मुंबई नाशिक महामार्गारील वाहतूक विस्कळित

भिवंडी : शुक्रवारी दिलेल्या तोंडी आश्वासनांची पूर्तता न केल्याने आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा भिवंडीत दाखल झाला आहे.१३ जून रोजी नाशिक येथून सुरुझलेला मोर्चा कसारा घाट उतरून शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाला होता.त्यावेळी स्थानिक काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या सोबत चर्चा घडवून आणली .परंतु मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासना नंतर ही मोर्चेकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून शासन मागण्यांच्या पूर्तते बाबत परिपत्रक काढून आश्र्वासित करीत नाही. तो पर्यंत बिऱ्हाड मोर्चा सुरू राहील असा निर्धार संघटनेच्या अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी बोलून दाखवला आहे.

शुक्रवार पासून शहापुर तालुक्यात तळ ठोकल्या नंतर सोमवारी सकाळी मोर्चेकरी भिवंडी तालुक्यात दाखल झाले. त्यांनी दुपारचा विसावा मुंबई नाशिक महामार्गावर कासणे येथे घेतला आहे. तेथे जेवणासाठी महामार्गावरच पंगत मांडल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.तेथे पडघा पोलिसांनी महामार्गावरील त्या भागातील वाहतूक एकाच मार्गीके वर वळविल्याने वाहतूक कोंडीचा सामना काही प्रमाणात वाहन चालकां ना करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील राज्यभरातून आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बि-हाड मोर्च्याचा आजचा सातवा दिवस असून शुक्रवारी मंत्रालयात झालेला चर्चेत तोंडी दिलेले आश्वासन सोमवारी संध्याकाळ पर्यंत तुम्हाला पुन्हा रूजू करून घेण्यासाठी परिपत्रक जारी करू असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले होते.परंतु सोमवारी सायंकाळी चार वाजता पर्यंत शासना च्या कोणत्याही प्रतिनिधींनी संपर्क साधला नसल्याची माहिती अध्यक्षा रुपाली आंधळे यांनी दिली आहे.तृतीय व चतुर्थ श्रेणी तील कर्मचारी आज सात दिवस उन्हातान्हाची पर्वा न करता आपला संसार घेवून रस्त्यावर उतरले तरी सरकार संवेदना दाखवत नसल्या बद्दल संघटनेच्या पदाधिकारी योगिता पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी