शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

भिवंडीत भाजपचाच बोलबाला ; तर काँग्रेस - राष्ट्रवादीची पाटी कोरी

By नितीन पंडित | Published: December 20, 2022 4:30 PM

भाजप ८ , शिंदे गट ४ तर ठाकरे गटाला अवघ्या एक जागेवर समाधान

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.१४ पैकी आठ जागांवर भाजपाचे सरपंच निवडून आले असून चार ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाने बाजी मारली आहे.तर ठाकरे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले असून या ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एकही जागा मिळवता आली नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली आहे. 

कामतघर येथील वऱ्हाळ देवी मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार अधिक पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरवात झाली.या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपा विरोधात शिंदे गट असेच समीकरण होते.त्यामुळे या ग्राम पंचायती निवडणुका केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती.विशेष म्हणजे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्वाची असलेल्या कोनग्रामपंचयात निवडणुकीत भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केल्याने पाटील यांनी कोनगावावर पुन्हा आपली पकड घट्ट केली असून या ठिकाणी भाजपच्या रेखा सदाशिव पाटील या विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावर पसरले आहे.तर भाजपमधून बंडखोरी करीत शिंदे गटाशी हात मिळवणी केलेल्या डॉ रुपाली अमोल कराळे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.त्यामुळे भाजप व शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या कोनग्रामपंचायत निवडणुकीत अखेर भाजपने आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले आहे तर कशेळी ग्राम पंचायतीवर मागील वीस वर्षांपासून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली असून त्यांची पत्नी वैशाली देवानंद थळे या विजयी झाल्या आहेत.

कोन ग्राम पंचायतीबरोबरच तालुक्यातील कोपर,कारीवली,कांबे,दुगाड,आमने,आवळे-विश्वगड,सापे अशा एकूण आठ ग्राम पंचायतींवर भाजप विजयी झाली असून कोपर हेमंत घरत,कारीवली संजीव नाईक,कांबे भारती भोईर, दुगाड प्रेम प्रकाश मुकणे,आमणे शिशुपाल केणे, आवळा-विश्वगड प्रीती पवन देसले,सापे गोरख सुतारअसे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.तर अकलोली ग्राम पंचयातीवर अपक्ष स्थानिक ग्राम समितीने यश मिळविला असून संचित सचिन म्हसकर या विजयी झाल्या आहेत.तर कशेळी,खानिवली,कासने,खालींग या चार ग्राम पंचायतींवर शिंदे गट विजयी झाला आहे.कशेळी ग्रामपंचायतीवर वैशाली देवानंद थळे,खानिवली निकिता राहुल दळवी,कासणे भगवान भोईर व खालींग राजाराम शेलार असे शिंदे गटाचे चार सरपंच विजयी झाले आहेत.तर उद्धव ठाकरे गटाला कुहे या एकमात्र ग्राम पंचायतीवर विजय मिळविता आला असून अजय आहेडा हे विजयी झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBhiwandiभिवंडी