शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
3
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
4
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
5
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
6
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
7
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
8
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
9
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
10
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
11
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
12
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
13
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
14
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
15
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
16
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
17
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
18
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
19
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
20
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

खरीप हंगामात अंबरनाथ तालुक्यात यंदा काळा भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:29 AM

बदलापूर : बळीराजाला आणि नागरिकांना असे दोघांनाही अतिशय लाभदायक असलेल्या काळ्या भाताचे वाण तालुका कृषी खात्याच्या पुढाकाराने तयार ...

बदलापूर : बळीराजाला आणि नागरिकांना असे दोघांनाही अतिशय लाभदायक असलेल्या काळ्या भाताचे वाण तालुका कृषी खात्याच्या पुढाकाराने तयार करण्यात यश आले आहे. खरीप हंगामासाठी पाचशे किलो काळ्या भाताचे वाण तयार केले आहे. त्यामुळे यंदा प्रथमच अंबरनाथ तालुक्यात सुमारे अडीच टन काळ्या भाताचे उत्पन्न येऊ शकेल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांत पावसाचे तंत्र बिघडले आहे. कधी जास्त पाऊस तर कधी कमी पाऊस, यामुळे खरीप हंगामातील भात हे मुख्य पीक कमालीचे बेभरवशाचे झाले आहे. गेल्या वर्षी हातातोंडाशी आलेले पीक पावसाळा लांबल्याने वाया गेले होते. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने अभ्यास करून अतिवृष्टीतही तग धरू शकणाऱ्या काळ्या भाताचे वाण स्थानिक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.

यंदा अंबरनाथ तालुक्यात काही निवडक शेतकऱ्यांना कृषी विभागाने उन्हाळी हंगामात काळ्या भाताचे २५ किलो बियाणे लागवडीसाठी दिले होते. त्यापासून आता ५०० किलो काळ्या भाताचे बियाणे तयार झाले आहे.

या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे काळा तांदूळ हा आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे, त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मधुमेहीसुद्धा हा भात खाऊ शकतात, त्यामुळे काळा भात हा नागरिकांच्या हिताचा आहे. काळा भात कितीही जोरात पाऊस पडला तरी तो शेतात उभा राहतो. या भाताच्या पिकाची उंची पाच ते सहा फूट इतकी असते, तसेच या भाताचा पेंढा अधिक काटक असतो. पूरजन्य परिस्थिती अथवा अतिवृष्टीतही तो वाकत नाही. त्यामुळे काळ्या भाताचे पीक वाया जात नाही. सर्वसाधारण तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ शेतकऱ्यांना जवळपास दुप्पट भाव मिळवून देतो. त्यामुळे काळ्या भाताची लागवड करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. साध्या भात लागवडीतून शेतकऱ्यांना प्रति किलो २० ते २५ रुपये मिळतात. काळा तांदूळ पन्नास रुपये किलो भावाने विकला जातो. बाजारात या तांदळाचा ८० ते १०० रुपये किलो भाव आहे. परिणामी, काळा भात हा शेतकऱ्यांना जसा लाभदायक आहे तसाच तो नागरिकांच्या हिताचा आहे.

अंबरनाथ तालुक्यातील चांदप येथे उन्हाळी हंगामात लावलेल्या काळ्या भाताची कापणी करण्यास प्रारंभ करण्यात आला.

-------------

फोटो आहे.