शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

ब्राह्मणांनी मारवाडी, गुजरातींचा आदर्श ठेवावा

By admin | Published: October 04, 2016 2:30 AM

प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत

डोंबिवली : प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे देशातील गरीब, दिव्यांग तसेच होतकरू तरुणांसाठी मग ते कोणीही असोत, एकत्र येणे हे मला जास्त गरजेचे वाटते, असे मत व्यक्त करतानाच सुप्रसिद्ध उद्योगपती व ‘विको’चे संजीव पेंढरकर यांनी, ब्राह्मण समाजाने मारवाडी आणि गुजराती यांचा आदर्श ठेवावा, असा मोलाचा सल्ला दिला आहे.ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासाकरिता सुरु असलेल्या एकत्रिकरणाबाबत पेंढरकर यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपली भूमिका एकांगी असू नये. बुद्धी कौशल्यावर भर देऊन त्या व्यक्तीस सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी एकत्र यावे, यात दुमत नाही. सर्वत्र समानता आणण्यासाठी निसर्गाने मानवाची निर्मिती केली आहे, याचे विस्मरण होऊ न देता एकत्रिकरण होणे, हे कधीही चांगलेच आहे. आपल्या मनातील वेदना आणि वास्तव मांडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असले तरी तो मार्ग मात्र विधायक असायला हवा.’पेंढरकर पुढे म्हणाले की, ‘गरीब मग तो कुणीही असो, त्याच्याकडे कौशल्य आहे, पण त्याला जर मजबूत हातांची आवश्यकता असेल, तर तो देण्यासाठी जे काही करण्यासारखे आहे, ते जरूर करावेच. पण त्यासाठी कुठलीही बंधने असायला नकोत. दुसरे म्हणजे केवळ नोकरीच्या मागे न लागता तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करण्यासाठी काही ध्येयधोरणे राबवावी. त्यासाठी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, त्या जरूर करून द्याव्यात. ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना राबवल्यास आपले परकीय चलनही वाचेल आणि जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पन्न) वाढेल. मात्र, त्यासाठी काही उपाययोजना जसे बँक कर्ज, सहजतेने कर्ज, परवाना या गोष्टींसाठी जाणत्या व्यक्तींनी समाजाला जरूर मदत करावी. जेणेकरून त्या व्यक्तींचा आत्मविश्वास उंचावेल आणि त्यांच्याकरीता पुढील वाटचाल सुकर होईल’. (प्रतिनिधी)