शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडील पादचारी पुल धोकादायक?; वाहनांवर बंदी घालण्याची मागणी

By सदानंद नाईक | Published: August 22, 2022 6:45 PM

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे.

उल्हासनगर - रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील वालधुनी नदीवरील एकमेव पादचारी पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ वाढली असून पूल धोकादायक झाला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती केली नाहीतर, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता चाकरमानी, शाळा, महाविद्यालयाच्या मुले व्यक्त करीत आहेत. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे सी.एच.एम. कॉलेजकडुन जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पादचारी पुल चाकरमानी, नागरिक, शाळा व महाविद्यालयातील मुलांसाठी येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आला होता. दरम्यान पुलाच्या मधोमध असलेले लोखंडी खांब काढून टाकण्यात आल्याने, मोटरसायकली, ऑटो रिक्षा यांची ये-जा पादचारी पुलावरून सुरू झाली. त्यामुळे पुलावरील दगडी फरसी उखळली असून जादाच्या भाराने पूल कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. दरम्यान पश्चिमेकडील दुसरा व जुना संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल पाडून, त्याठिकाणी नवीन पुल बनविण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा एकमेव पादचारी पुल सुरू आहे.

महापालिका व रेल्वेने नागरिक, चाकरमानी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी महापालिकासह रेल्वेकडे केली आहे. स्टेशनकडे जाणारा मात्र वालधुनी नदीवरील हा एकमेव पादचारी पूल जुना असून जादाच्या वाहतुकीने धोकादायक झाल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या पुलाचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने, पुलाचे काम जलद सुरू करण्याची मागणी होत आहे. मोठा अपघात घडण्यापूर्वी महापालिकेने सी.एच.एम कॉलेज कडुन पादचारी पुलावरुन जाणाऱ्या मोठ्या वाहनाना बंदी घालावी. अशी मागणीने जोर पकडला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर