शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

मीरारोड मध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: October 23, 2023 9:03 PM

व्यापाऱ्यांचा बंद तर लोकांच्या संतापा नंतर महापालिकेला कारवाईची जाग

धीरज परब / मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मध्ये अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या दादागिरी व गुंडगिरी ने रहिवाशी , दुकानदार त्रासले असताना रविवारी रात्री एका ६० वर्षीय दुकानदारास मारहाण केल्या प्रकरणी २५ ते ३० फेरीवाल्यांवर नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या  घटनेने संतप्त दुकानदारांनी बंद पुकारला तर रहिवाश्यांनी तत्कालीन नगरसेवक आणि महापालिकेच्या हप्तेखोरीमुळे फेरीवाले प्रचंड वाढून गुंडगिरी होत असल्याचा आरोप केला . पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला तर पालिकेने फेरीवाल्यांचे शेड आदी तोडण्यास सुरवात केली. 

शांती नगर सेक्टर १ , इमारत क्र . ५९ मध्ये दुकान ५ व ६ मध्ये मायरी नावाचे गुमानसिंग राजपुरोहीत ( ६० ) यांचे दुकान आहे . दुकान समोर त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती . रविवारी रात्री ११ च्या सुमारास एका फेरीवाल्याने त्याची दुचाकी काढताना राजपुरोहित यांच्या दुचाकीचे सीट कव्हर फाटल्याने त्यांनी हळू गाडी काढ असे फेरीवाल्यास सांगितले . त्याचा राग येऊन अशीच गाडी लावेन सांगून आरडाओरडा व शिवीगाळ सुरु केली . त्यासरशी अन्य फेरीवाले धावून आले . 

फेरीवाल्यांची राजपुरोहित व त्यांचा कर्मचारी करणसिंग ह्या दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेने संतप्त दुकानदार, काही नागरिक पोलीस ठाण्यात दाखल झाले .  आमदार गीता जैन पहाटे २  च्या सुमारास पोहचल्या नंतर पोलिसांनी हल्लेखोर अजहर हैदर शेख, झोएब अल्ताफ शेख व अन्नान मोहमद सुतार, राजपुरोहित यांच्या दुकान समोर बाकडे लावणारे दोघे आणि इत्तर  २० ते २५ फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . 

सोमवारी घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या  भागात पोलिसांसह एआरपीची तुकडी तैनात केली . परिसरात तणावपूर्ण शांतता होती . दुकानदारांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला . आ . जैन यांनी पालिका आयुक्त संजय काटकर , उपायुक्त अतिक्रमण मारुती गायकवाड व पोलिसांसह शांती नगर मध्ये जाऊन रहिवाशी आणि दुकानदार यांचे म्हणणे ऐकले . 

यावेळी काही रहिवाशी आणि दुकानदारांनी महापालिका, पोलीस तसेच तत्कालीन अनेक नगरसेवकां बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप करत यांच्या हप्तेखोरी मुळेच शांती नगर मध्ये फेरीवाल्यांनी रस्ते , पदपथ व मोकळ्या जागांवर बस्तान मांडले . सोसायटीचे प्रवेश द्वार सुद्धा सोडले नाहीत . 

गेल्या अनेक वर्षां पासून तक्रारी करून सुद्धा ठोस कारवाई हो नसल्याने फेरीवाले मुजोर होऊन त्यांची गुंडगिरी अनेक वर्षां पासून रहिवाशी सहन करत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले . गुंडगिरी , चोऱ्या , महिला - मुलींची छेडछाड सारखे प्रकार होऊन सुद्धा कोणी गांभीर्याने घेतले नाही असे आरोप लोकांनी केले . 

या घटने नंतर महापालिकेने फेरीवाल्यांचे शेड , बाकडे आदी अतिक्रमणे जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने काढण्यास सुरवात केली . परंतु हि कारवाई केवळ दिखाव्या पुरती नको.  पालिका पथक येणार याची माहिती फेरीवाल्यांना आधीच मिळते. पथक आले तर थातुरमातुर कारवाई करून निघून जाते असे लोकं म्हणाले .

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोडMumbaiमुंबई