शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर प्लास्टिकपासून का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 06:59 IST

पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही

मीरा रोड : पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही, असा सवाल करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले.भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची समस्या व संधी यावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. देशातील १६ राज्यांमधून २०३ जणांनी यात सहभाग घेतला होता. रविवारी राज्यपालांच्या उपस्थितीत या चर्चासत्राचा समारोप झाला. उद्योगपती निरंजन हिरानंदानी, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, रेखा महाजन, रवींद्र साठे, उमेश मोरे, रवी पोकरणा, आमदार गीता जैन आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी राज्यपाल म्हणाले की, पूर्वी प्लास्टिक नव्हते, तेव्हा आपण जगतच होतो. पण आज प्लास्टिक जीवनाचा एक भाग बनला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या तेव्हा काच, धातूच्या बाटल्या होत्याच. मग आता का नाही प्लास्टिकशिवाय जगू शकत? आपल्याला जीवनशैलीत आणि सवयीत बदल करावा लागेल. प्लास्टिकबंदीमुळे रोजगार बुडेल हा विषय बाजूला ठेवा. उद्योगपतींना रोजगार बंद होईल म्हणून काळजी नसते. त्यांना भिती त्यांचा उद्योग बंद होणार, याची असते. तंबाखू बंदीच्या समितीवर असताना तंबाखू उत्पादनापासून बीडी बनवणे आदी कामात लाखो शेतकरी व बीडी मजुरांचा प्रश्न होताच. पण त्याचा लाखावा हिस्साही प्लास्टिकबंदीमुळे बाधित होणार नाही. प्लास्टिक व्यवसायात काम करणाºया कामगारांना दुसरे काम देता येऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकबंदीआड रोजगाराचा विषय बाजूला ठेवा.आपल्याकडे हुशार लोकं आहेत. त्यांनी सरसकट प्लास्टिक बंदी केलेली नसून, केवळ एकदा वापरल्या जाणाºया प्लास्टिक वस्तुंना बंदी केली आहे. गायींना प्लास्टिक खाल्याने खुप त्रास होतो. त्यामुळे प्लास्टिक न वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वदेशी चळवळ झाली तर आपण स्वदेशी वस्तुंकडे वळलो. पंतप्रधानांनी स्वच्छतेचा संदेश दिला, तो अगदी खेड्या पाड्यात पोहचला. घराघरात शौचालयाचा संकल्प केला, तर ८ कोटीपेक्षा जास्त शौचालयं घराघरात बांधली गेली. २०० वर्षांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त होऊ शकतो तर आता आलेल्या प्लास्टिकपासून मुक्त का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.या शिबीरानंतर प्लास्टिक बंदी - वापराबाबत म्हळगी प्रबोधिनी आचारसंहिता बनवणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जगण्यातून प्लास्टिक बाजूला काढू. हे देशासाठी मोठे योगदान ठरेल, असे सांगत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. प्लास्टिक वापराबाबत दोन महिन्यात आचारसंहिता तयार करुन जनजागृती करणार असल्याचे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले. तर, प्लास्टिकचा वापर आणि ते नष्ट कसे करतो, हे महत्वाचे आहे, असे हिरानंदानी म्हणाले.‘महाराष्ट्रात राहतो, तर मराठी शिकावे’ठाणे : हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो, तर मराठी बोलायला शिकले पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी ठाण्यातील आर. जे. ठाकूर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये व्यक्त केले. चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खूप चांगल्याप्रकारे समाजोपयोगी कार्य करीत आहे. त्यांनी हे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतोे, असेही ते म्हणाले. या फाउंडेशनतर्फेउत्कृष्ट काम केल्याबदल सुरेश राणाजी, बिरेंद्र नेगी, डॉ. दिनेश चंद आदींना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर