शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मुख्यमंत्री की व्हॉइसरॉय? हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा; जितेंद्र आव्हाड यांनी लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 5:35 AM

आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोलिसांना हाताशी घेऊन हा बंद करण्यात आला आहे. हा बंद म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. मोर्चा निघणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्था, वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी पोलिसांना सूचना देणे गरजेचे होते. पण,  मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण होत असेल, बस बंद केल्या जात असतील तर  ही दडपशाही आहे. मुंबईतील महामाेर्चा दडपण्यासाठीच हा बंद घडवून आणला. ते मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय आहेत, असा प्रश्न पडला असल्याचेही आव्हाड म्हणाले. 

महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी आनंदनगर चेकनाका येथून राष्ट्रवादीचे सुमारे पाच हजार पदाधिकारी, वारकरी मुंबईच्या दिशेने बसने रवाना झाले. तेव्हा आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ठाण्याहून हजारो लोक मुंबईला निघाले आहेत. त्यांच्या मनात आक्रोश आहे. सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेले अवमानजनक वक्तव्य याविराेधात हा आक्रोश आहे, असे ते म्हणाले. ठाण्यात बंद पुकारून परिवहन सेवा बंद ठेवून, रिक्षाचालकांना दमदाटी करून नागरिकांना वेठीस धरण्यात आले. त्यांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलेला आहे. पण खुद्द वारकरी हे आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ९ वर्षांपूर्वीचे पुराण काढण्याचा हा प्रकार असून त्यांचे हे नवीन नाटक असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना ठाणे बंदविषयी छेडले असता, त्यांनी सर्व बनावट आहे. आम्हीही वारकरी आहोत. पिढ्यानपिढ्या वारकरी परंपरा जपत आहोत, असे सांगितले. यावेळी आव्हाड यांनी त्या वारकऱ्यांसमाेर नतमस्तक होऊन त्यांचे धन्यवाद मानले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड