शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
3
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
4
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
5
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
6
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
7
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
8
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
9
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
10
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
11
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
12
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
13
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
14
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
15
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
16
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
17
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
18
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
19
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
20
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

"मुख्यमंत्री साहेब तुम्हीच शेवटचा आधार, खाजगी शाळांच्या छळापासून वाचवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:54 PM

मीरा भाईंदरमधील पालकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे; खाजगी शाळांच्या मनमानी फी वसुलीविरुद्ध पालक उतरले रस्त्यावर

मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे आधीच आमच्या नोकऱ्या - व्यवसाय बंद असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे . शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिकवण्याच्या आड पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापना कडून गलेलठ्ठ फी साठी तगादा लावून आमच्या मुलांना व आम्हाला वेठीस धरून छळ केला जात आहे . येथील लोकप्रतिनिधी - अधिकारी यांना सांगून देखील न्याय मिळत नसल्याने आता तुम्हीच शेवटचा आधार आहेत असे साकडे मीरा भाईंदर मधील पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . 

मीरा भाईंदर मधील विविध मोठ्या खाजगी शाळांच्या पालकांनी आज सोमवरो शाळांच्या बाहेर जमून आपला संताप व्यक्त केला . कोरोना संकटा मुळे आमच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय ठप्प झाला आहे . आमची अक्षरशः होरपळ चालली आहे . या आधी आम्ही या शाळांनी मागितल्या तेवढ्या लाख लाख रुपयांच्या फी भरल्या आहेत . पण आता फी भरणे अशक्य झालेले आहे . शाळांनी तर लेट फी सुद्धा आकारली आहे . 

आम्हा पालकांना विविध प्रकारे घाबरवले जातेय . ज्यांनी फी भरली त्यांच्या साठी ऑनलाईन वर्ग सुरु केले . परीक्षा घेतल्या जात आहेत . ज्यांना फी भरता आली नाही त्यांच्या मुलांना ओलनलाईन शिक्षण नाही व परीक्षा देखील नाही . दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील फी न भरल्याने अभ्यास बंद केला आहे . काही शाळा तर पालकां कडून हमीपत्र लिहून घेत आहेत . काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी , मिसलेनियस शुल्क अजूनही आकारत आहेत . ज्या पालकांनी फी कमी करा म्हणून शाळांना ईमेल केला त्यांना शाळेच्या वकीला मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहे . 

शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे . ऑनलाईन शिकण्यासाठी आमची मुलं घरातूनच अभ्यास करणार व त्यांचा त्यासाठी लागणारा सर्व खर्च देखील पालकच करणार आहेत . शाळा बंद आहेत पण तरी देखील शाळेचे व्यवस्थापन मात्र संपूर्ण वर्षाची आणि पूर्वी प्रमाणेच फी भरण्याचा तगादा लावत आहे . 

आम्ही स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्स्ना हसनाळे , शिक्षणअधिकारी उर्मिला पारधी , पालिका आयुक्त व अधिकारी आदीं कडे तक्रारी केल्या , गाऱ्हाणी मांडली . पण कोणी दाद दिली नाही . पारधी यांनी तर तुम्ही आणि तुमची शाळा काय ते बघून घ्या असे सांगून उत्तर दिले . 

अश्या बिकट परिस्थिती मध्ये आता मुख्यमंत्री तुमचाच शेवटचा आधार आहे . आम्हाला व आमच्या मुलांना वाचवा . त्यांना शिक्षणा पासून वंचित होऊ देऊ नका असे साकडे या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . शाळांची सरसकट ५० टक्के फी कमी करा . फी भरली नाही म्हणून मुलांचे शिक्षण थांबवू नका अशी विनंती पालकांनी केली आहे . 

टॅग्स :SchoolशाळाUddhav Thackerayउद्धव ठाकरे