शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बोहल्यावर चढण्याअगोदरच प्रशासनाने रोखला बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:56 IST

बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते.

कसारा - बालविवाह हा गुन्हा असून तो रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेश केले जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी बालविवाह केला जातो. असाच एक बोहल्यावर चढण्याअगोदरच होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. शहापूर येथील मोखवणेमध्ये बालविवाह होणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोखवणे येथे मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी दोन लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातील एक विवाह अल्पवयीन जोडप्यांचा होणार होता. 12 वर्षाची चिमुरडी व 18 वर्षाचा मुलगा यांचा विवाह होणार होता. परंतु या बालविवाहाची माहिती शहापूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी व ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना मिळाली होती. 

मोखवणे येथील बालविवाहाची माहिती मिळताच दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने कसारा पोलीस ठाणे व मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना केल्या. तसेच  विवाहस्थळी पोहचून बालविवाह रोखण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठांचा आदेश मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के. बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांनी मोखवणे गाव गाठले व पोलीस पाटील पांडुरंग भोईर यांना सोबत घेऊन विवाह होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

12 वर्षाच्या मुलीला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून लग्न मंडपात आणण्याची तयारी सुरू होती. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा विवाह हा गावातील एका 18 वर्षाच्या मुलाशी होणार होता. मात्र विवाहाच्या ठिकाणी पोलीस व अन्य लोक आल्याने मांडवातील वऱ्हाडी व मुला-मुलीच्या नातेवाईकांचा एकच गोंधळ उडाला. समय सूचकता दाखवून आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केले व स्थानिक महिला, बचतगट, शिक्षक यांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. 

काही दिवसांपूर्वी उमरगा येथील एका कुटुंबाने १४ वर्षीय बालिकेचा विवाह निश्चित केला होता. मात्र, तत्पूर्वीच याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना कायद्याची माहिती दिली. तब्बल 7 तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ते कुटुंब बालविवाह थांबविण्यास राजी झाले अन् ‘त्या’ अल्पवयीन मुलीची बालदिनी बालविवाहातून सुटका झाली. संबंधित कुटुंबाने 20 नोव्हेंबरला विवाह नियोजित केल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीस मिळाली होती. समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस