शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली 

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2023 20:02 IST

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. 

उल्हासनगर: भारत स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिकेच्या वतीने सोमवारी शहरातून स्वच्छता जनजागृती रैली काढण्यात आली. यावेळी एसएसटी महाविद्यालयाच्या मुलांनी जनजागृतीवर पदनाट्य सादर केले. 

उल्हासनगर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. भारत स्वच्छता अभियान अंतर्गत शहर कचरा मुक्त होण्यासाठी सोमवारी जनजागृती रॅलीचे आयोजन शहरातून करण्यात आले. रैलीत सफाई कामगार, कोणार्क कंपनीचे कचरा गोळा करणारे कामगार, एसएसटी महाविद्यालयाचे तरुण-तरुणी, महापालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कॉलेजच्या मुलांनी स्वछता बाबत पदनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रैलीतील मुलांना प्रोत्साहन देऊन स्वछता रैलीचे कौतुक केले. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे. नागरिकांनी घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा. असे आवाहन त्यांनी केले. 

शहरात एकीकडे स्वच्छते बाबत रैली निघत असतांना, दुसरीकडे कचरा उचलणारा ठेकेदार अटी व शर्तीचा भंग करून उघड्या डंपर व तुटलेल्या गाड्यातून कचऱ्याची वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. असा डंपर व गाड्यातून वाहून नेण्यात येणारा कचरा रस्त्यात खाली पडत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तसेच बहुतांश कचरा कुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत असल्याचे अस्वच्छ चित्र शहरात आहे. स्वच्छता जनजागृती रैली काढण्यापूर्वी महापालिकेने शहर कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. कचरा उचलण्यावर महापालिका वर्षाला १८ कोटी पेक्षा जास्त खर्च करूनही शहरात कचऱ्यापासून दुर्गंधी येत आहे. हे चित्र बदलण्याची मागणी राजकीय पक्षाचे नेते वारंवार महापालिकेकडे करीत आहेत.  

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर