शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

IRB चा दहिसर टोलनाका बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 6:45 PM

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग-४ (नवीन ४८) यावर अवजड व हलक्या वाहनांकडून आयआरबी कडून टोल वसूल केला जात आहे

ठाणे - रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी कंपनीचा दहिसर टोलनाका बंद करण्याची मागणी मनसेचे  कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी लेखी निवेदन देखील मंत्री भुसे यांना दिल आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग-४ (नवीन ४८) यावर अवजड व हलक्या वाहनांकडून आयआरबी कडून टोल वसूल केला जात आहे. हा  टोल नाका २००६ पर्यत कार्यरत होता . त्याची मुदत २०१९ मध्ये संपली होती. परंतु पुन्हा एम.एस.आर.डी.सी. कडून  मुदतवाढ देण्यात आली आहे.मात्र टोल वसुली साठी रस्ता पूर्ण व सुस्थितीत असणे आवश्यक असते. परंतु या महामार्गाची दुरवस्था झाली असून जागोजागी भले मोठे खड्डे,गटारांची व्यवस्था नाही,कलव्हर्ट(मोऱ्या) नाहीत.या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी साचलेले असते यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली असते. या महामार्गावरील अपघातांमध्ये अनेकांनी जीव गमावले असून कित्येकजण जखमी झाले आहेत. सद्य परिस्थितीत महामार्गाच्या चार लेन कार्यरत नसून टोल वसुली जोरात सुरू ठेवण्यात आली आहे.या सुरू असलेल्या टोल वसुलीकडे एम.एस.आर.डी.सी. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रात  पाटील यांनी केला आहे.

....तरीही परिस्थिती जैसे थे 

महामार्गावरील समस्यांबाबत मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी एम.एस.आर.डी. सी.च्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष दौरे करून रस्ता रुंदीकरण, दुरुस्ती, कन्व्हल्टं करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावेळी आयआरबी चे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र त्यानंतर अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे.त्यामुळे तातडीने चौकशी करून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोल तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे या पत्रावर आता मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील