शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीबाबत आयुक्त घेणार आढावा बैठक

By सदानंद नाईक | Published: September 19, 2022 5:45 PM

शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून मृत्यूचे तांडव सुरू

सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून मृत्यूचे तांडव सुरू असून शासनाच्या पुनर्बांधणी राजपत्रकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आयुक्त अजीज शेख हे गुरूवारी धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगरात एका वर्षात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून १५ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला. तर हजारो नागरिक बेघर झाले. धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी एक समिती गठन करून एका महिन्यात नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी गुड न्यूज दिली. उल्हासनगरातील धोकादायक इमारतीचे पुनर्बांधणी व सन २०२१ पर्यंतची अवैध बांधकामे नियमित करण्याचा समितीचा अहवाल मिळाला असून लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर शहरात फटाक्यांची आतिषबाजी होऊन शिंदे गटाच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त केला होता. तसेच शहरभर पोस्टर्सबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर शासनाने धोकादायक इमारत पुनर्बांधणी व अवैध बांधकाने नियमित करण्या बाबतचे परिपत्रक काढले नसल्याने, नागरिकांत धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून बळीची संख्या वाढत आहे. तसेच बेघर नागरिकांची संख्या हजारोच्या संख्येत गेली. रविवारी सकाळी साडे आठ वाजता साई सदन इमारतीची गच्ची शेजारील घरावर पडून ६१ वर्षीय गोपाळदास गोबरा यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. आयुक्त अजीज शेख यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून अधिकारी, राजकीय नेते व नगररचनाकार यांच्याशी चर्चा केली. तसेच शहरातील धोकादायक इमारती बाबत गुरवारी आढावा बैठक बोलविल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

शहरासाठी लवकरच आनंदवार्ता- प्रांताधिकारी

शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी व सन २०२१ पर्यंतची अवैध बांधकामे नियमित करण्या बाबत नियुक्त केलेल्या समितीने मुख्यमंत्री यांना अहवाल दिला. तो अंतिम टप्प्यात आहे. शासन कधीही याबाबत परिपत्रक काढून शहरवासियांना आनंदाची बातमी देण्याची शक्यता प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना