शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

राज ठाकरेंची तुलना इंदिरा गांधींशी, ईडीविरोधात जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:46 IST

कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी केंद्रीय गृहंमत्री पी. चिदंबरम यांची चौकशी म्हणजे एक राजकीय दबावतंत्र आहे. इंदिरा गांधी यांच्याबाबतही असच घडलं होत. इंदिरा गांधींना तुरुंगात टाकल्यानंतर इंदिरा गांधींना न माननारी लोकही इंदिरा गांधींच्या पाठिशी उभी होती, हे सरकारने विसरु नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवरील कारवाईविरुद्ध सरकारवर आरोप केले आहेत.  

कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी केला आहे. दमानियांच्या या टीकेला आता खुद्द  पवारकन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनीच नाव न घेता उत्तर दिलं आहे. त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं सांगत सरकारवर टीका केली. 

जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंना आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर रहायचे होते. त्यामुळे कार्यकर्ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाणे पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवलय. याच मनसे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड पोलिस स्टेशनला गेले होते. या सरकारने सुडाचे राजकारण सुरु केलय आणि त्याचा फटका सामान्य कार्यकर्त्यांना बसतोय. त्यामुळे सरकारने हे सुडाचे राजकारण बंद करावे. तपासात सर्व सत्य समोर येईल. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत ईव्हीएम हटाव सगळं सत्य बाहेर येईल, अस म्हटलंय.  

राज ठाकरेंची चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्या परिवारावर कोणी टिका करू नये. ईडी म्हणजे सरकारचा राजकीय स्टंट आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू आहे ईडीच्या दबाव तंत्रामुळेच सर्व नेते सेना-भाजपात जात आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.  

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय