शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:40 AM

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाने ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांच्या किनारपट्टीवरील नागरिकांच्या घरांंसह शेती, भाजीपाला, उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या ...

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाने ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहरांच्या किनारपट्टीवरील नागरिकांच्या घरांंसह शेती, भाजीपाला, उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना आवश्यक भरपाई मिळवून देण्यात यावी, यासाठी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन नुकसानीचा अहवाल त्यांना दिला आहे.

ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर ही शहरे बहुतांश खाडीकिनारी वसलेली आहेत. चक्रीवादळामुळे या खाडी किनारपट्टीवरील, भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे तसेच त्यांच्या राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. भाईंदर पश्चिम भागातील गावांमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाणे घोडबंदर पट्ट्यातील कोलशेत, वाघबीळ, बाळकुम, कासारवडवली, मोगरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, नागले या गावातील शेती करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीकडे विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

नवी मुंबईतील खाडीकिनारी असलेल्या गावठाणातील व पामबीच मार्गावर, सानपाडा मोराज सर्कलजवळ विशाल नारळकर या तरुणाचा विद्युत पोल अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याला राज्य शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

---------

गेल्या वर्षी चक्रीवादळादरम्यान उत्तनच्या मासेमारी हंगामात मासेमारी करता आली नाही, यासाठी राज्य शासनाने या मच्छीमारांना आर्थिक साहाय्य घोषित केले आहे. त्यामध्ये दोन हजार ८१४ लाभार्थ्यांना मच्छीमारनौका व मासळीविक्रेता महिलांना तीन कोटी ७० लाखांची मदत मिळवून दिली याबद्दल खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

----------

* खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदर शहरासाठी स्मशानभूमी व दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे.

---------