शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘त्या’ मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई द्या, उच्च न्यायालयाचे ठाणे पालिकेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 03:42 IST

लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

मुंबई : बस अपघातात मृत्यू पावलेल्या किशोरवयीन मुलाच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याचा वाहन अपघात लवादाचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्या पालकांना अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याचा आदेश ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाला (टीएमटी) दिले.लवादाने टीएमटीला मुलाच्या पालकांना २२ लाख रुपये अर्ज केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला. त्याला टीएमटीच्या व्यवस्थापकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या अपिलावरील निर्णय मंगळवारी दिला.५ डिसेंबर २०१४ रोजी दहावीत शिकत असलेला ध्रुव ठक्कर हा मुलुंड पूर्वेला असलेल्या ज्ञान सरिता उच्च माध्यमिक शाळेसमोरून टीएमटीची बस पकडत होता. तेवढ्यात वाहकाने बसची बेल वाजवली. त्यांनतर बस सुरू झाली आणि ध्रुव बसच्या दारातून खाली पडून आला. त्याचा पाय चिरडला गेला. दोन रुग्णालयांतून त्याला हलविण्यात आले आणि १३ फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला.टीएमटीने लवादाच्या निर्णयाला आव्हान देत म्हटले की, बस थांबण्यापूर्वीच ध्रुव बसमध्ये चढला. तसेच पालकांनी दिलेले बिल अवाजवी असल्याने नुकसानभरपाई मिळणार नाही, असे टीएमटीच्या वकिलांनी सांगितले. तर ध्रुवच्या पालकांच्यावतीने निखिल मेहता यांनी सांगितले की, वाहकाने मान्य केले आहे की, ध्रुव बसमध्ये चढत असल्याचे त्याने पाहिले नाही तर चालकाने उलट तपासणीत मान्य केले की त्याने अपघात पहिला नाही. रुग्णालयांची बिले लवादापुढे सादर केली. उलट लवादाने त्यात अतिरिक्त नुकसानभरपाई दिली पाहिजे.वार्षिक ८ टक्के व्याजअर्जदाराने व प्रतिवाद्याने सादर केलेली सर्व कागदपत्रे व तोंडी पुरावे विचारात घेत लवादाने स्पष्ट केले की, ध्रुव बस चढत असताना वाहकाने पाहिले नाही आणि बसची बेल वाजवल्याने चालकाने बस पुढे नेली. त्या दोघांच्या दुर्लक्षामुळे ध्रुवला अपघात झाला, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. लवादाने योग्य निर्णय दिल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने लवादाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली. उच्च न्यायालयाने टीएमटीला २६ लाख रुपये नुकसान भरपाई अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून वार्षिक ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.

टॅग्स :thaneठाणे