शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी

By नितीन पंडित | Published: January 24, 2024 4:21 PM

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.

नितीन पंडित, भिवंडी:काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीच्या वतीने भिवंडीतील रांजणवाडी नाका येथे कोकण आढावा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. 

या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,विरोधीपक्ष नेते विजय वड्डटीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आरिफ नसीम खान,चंद्रकांत हांडोर,भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळावा प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत भिवंडी लोकसभा काँग्रेस लढविणार का ? या प्रश्नावर उत्तर देणे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह,प्रदेश प्रभारी व इतर माजी मंत्र्यांनीही उत्तर देणे टाळले.

इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्या नंतर या विषयावर बोलू असे उत्तर यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रश्नावर अक्षरशः चुप्पी साधली.वरिष्ठांनी या विषयी चुप्पी सधल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून कोकण विभागीय मेळाव्यानंतरही काँग्रेसकडे लोकसभा उमेदवारी येणार की,राष्ट्रवादी या लोकसभेवर आपला दावा मजबूत करणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.तर कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका मनात आणू नये पक्ष संघटना बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आव्हान यावेळी काँग्रेस वरिष्ठानकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा