शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

जीपीएस प्रणाली नियंत्रण कक्षाशी जोडा

By admin | Published: July 07, 2017 6:24 AM

रिक्षातून बाहेर फेकणे अथवा रिक्षामध्ये महिलांसोबत छेडछाड करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. परंतु, यामुळे आपल्या उपजीविकेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षातून बाहेर फेकणे अथवा रिक्षामध्ये महिलांसोबत छेडछाड करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. परंतु, यामुळे आपल्या उपजीविकेसाठी ज्या महिला रिक्षा चालवत आहेत त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे रिक्षा चालकांकडून असे प्रकार घडत असतांना एखाद्या प्रवाशानेच महिला रिक्षा चालकाबरोबर अश्लिल वर्तन केले तर आम्ही दाद कोणाकडे मागायची असा सवाल आता महिला रिक्षाचालकांनी केला आहे. त्यामुळे महिलांच्या रिक्षामधील जीपीएस सिस्टीम ही पोलीस कंट्रोल रूमशी जोडली गेली पाहिजे, ज्यामुळे पोलीस यंत्रणादेखील आमच्या बरोबर राहून आम्ही सुरक्षित राहू, असा विश्वास या महिला रिक्षा चालकांनी व्यक्त केला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहरात प्रवासाची अनेक साधने असली तरी ठाणे परिवहनच्या संथ कारभारामुळे रिक्षा हे महत्त्वाचे साधन प्रवाशांच्या दृष्टीने बनले आहे. परंतु, बुधवारी रात्री एका मुलीची छेड रिक्षाचालकाने काढल्याची घटना समोर आली. मागील काही महिन्यात रिक्षातून महिलांना फेकणे किंवा विनयभंग करणे अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकट्या दुकट्या महिलेने रिक्षात बसायचे की नाही? असा प्रश्न समस्त महिलांना पडू लागला आहे. काही वर्षापूर्वी स्वप्नाली लाड या मुलीला चालत्या रिक्षातून फेकण्यात आले होते, ही घटना कापूरबावडी या ठिकणी घडली होती. त्यातून स्वप्नाली कशबशी बचावली होती. पुढे काही महिन्यातच रत्नागिरीवरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या दोन मुलींना एक रिक्षाचालक पळवून घेऊन चालला होता. त्यावेळी नितीन पुलाजवळ या मुलींनी आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती. या सर्व घटना ठाणेकर विसरत नाही तोच एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तिने प्रतिकार केल्यामुळे तिला रिक्षातून बाहेर फेकण्यात आले. ती मुलगी जरी या घटनेतून बचावली असली तरी मात्र सतत सुरु असलेल्या या घटनेमुळे रिक्षाचालक व असे प्रवाशी यांचा धसका ठाण्यातील महिलांनी घेतला आहे. त्यात आता ज्या महिला आपल्या उपजीविकेसाठी रिक्षा चालवत आहेत. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आजघडीला अशा रिक्षा चालकांची संख्या ही २०० च्या वर गेली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील आता तितकीच महत्वाची ठरली आहे. आम्ही एकट्या असतो आणि मागे तीन प्रवासी बसलेले असतात ते कोण, कोणत्या प्रवृत्तीचे आहेत हे कोणीच ओळखू शकत नाही. त्यांच्य बरोबर आम्हाला कधी कधी लांबच्या पल्यापर्यंत जावे लागते. अशा वेळी एखादा कोणी वाईट प्रवृत्तीचा प्रवासी निघाला, तर आम्ही काय करणार असा सवाल आता या महिला रिक्षा चालकांना सतावू लागला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या रिक्षात जीपीएस सिस्टीम लावण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु ही प्रणाली आरटीओ विभागाशी जोडण्यात आली आहे. ज्या प्रकारे या घटना वाढत आहेत त्या अनुषंगाने ही जीपीएस सिस्टीम ठाणे पोलीस कंट्रोल रूमशी जोडली गेली तर आम्ही सतत पोलिसांच्या छत्रछाये खाली राहू आणि सुरक्षित राहू अशी मागणी या महिला रिक्षाचालकांनी केली आहे. तसेच आम्हाला पुरु ष रिक्षाचालकांनाचादेखील मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते नेहमीच आमच्याशी उद्धट बोलतात, कट मारून जातात, रिक्षा अंगावर घालण्याचादेखील प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या बाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार केला जाईल, असे ठाणे पोलीस वाहतूक विभागाने सांगितले आहे.