शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नऊ तलावांचे होणार संवर्धन; कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By नितीन पंडित | Published: September 01, 2023 5:42 PM

भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचे सवंर्धन करण्याबरोबरच सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांवरून राज्य सरोवर संवर्धन विकास योजनेतून तलावांच्या विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे.यापूर्वीच भिवंडी शहरातील वऱ्हाळदेवी तलावाच्या संवर्धनासाठीचा ५३ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे अशी माहिती शुक्रवारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्याच्या पर्यावरण विभागाकडून राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत तलावांचे पुनरुज्जीवन,प्रदूषण कमी करण्याबरोबर तलाव संवर्धन करण्यासाठी गावांमधील तलावांचा समावेश केला जातो.त्यानुसार तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच परिसरात झाडे लावणे, सोलार पथदिवे, बेंचेस, निर्माल्यकलश बसविण्यात येतात.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहा तलावांचा राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार कल्याण तालुक्यातील उतणे चिंचवली येथील उतणे तलावासाठी दोन कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव, मुरबाड तालुक्यातील तळवली-बारगाव तलावासाठी दोन कोटी ४४ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील धामणगाव तलावासाठी ३ कोटी ९७ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वडपे तलावासाठी ४ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव, भिवंडी तालुक्यातील वाशेरे तलावासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आणि भिवंडी तालुक्यातील कोनगावातील कोन तलावासाठी पाच कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

तसेच या तलावांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधीही तातडीने वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे या तलावांच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. या कामांबरोबरच बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव तलावासाठी दोन कोटी ३४ लाख, जुवेली गावासाठी दोन कोटी ८५ आणि कात्रप गावासाठी ४ कोटी ५३ यासाठी नगरपालिकेला १० कोटी निधी मंजूर केलेला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वऱ्हाळदेवी तलावासह आणखी सहा तलावांच्या संवर्धनासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBhiwandiभिवंडी