शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

चिखलोली स्थानकाच्या उभारणीला मिळाला मुहूर्त

By पंकज पाटील | Updated: October 12, 2023 14:46 IST

या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अंबरनाथ : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली चिखलोली रेल्वेस्थानकाची अंबरनाथ आणि बदलापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. रेल्वे प्रशासनाने चिखलोली स्थानक उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून, तब्बल ८२ कोटी रुपये खर्च करून चिखलोली स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प अर्थात एमयूटीपी ३ अंतर्गत कल्याण ते बदलापूर रेल्वेस्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे ट्रॅकचे काम केले जाणार आहे. याच प्रकल्पांतर्गत अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकादरम्यान चिखलोली स्थानक उभारले जाणार आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून चिखलोली रेल्वेस्थानक लवकरच उभारले जाईल, अशी बतावणी करून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या गृहप्रकल्पातील घरे विकली होती.  मात्र प्रत्यक्षात चिखलोली स्थानक उभे न राहिल्यामुळे घर घेतलेल्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चिखलोली रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर या रेल्वेस्थानकाच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. तसेच हे स्थानक उभारण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य शासन यांनी आर्थिक हातभार लावण्यास मंजुरी दिली होती. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली आहे.

- चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्यासाठी जी निविदा काढण्यात आली आहे, त्या निविदेची मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत आहे. ही निविदा उघडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.''

- एकीकडे निविदा काढलेली असताना दुसरीकडे रेल्वेस्थानकाची जागा ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्यात आली आहे.

- चिखलोली रेल्वेस्थानकांसोबतच कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका टाकण्यासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती ती पूर्णत्वास नेणार आहेत. या प्रकल्पासाठी २०८ कोटींचा प्रस्ताव असून, त्यातील १०४ कोटी रुपये राज्य शासन रेल्वे प्रशासनाला हा प्रकल्प उभारण्यासाठी देणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

- चिखलोली रेल्वेस्थानक आणि तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचे काम करण्यासाठी निधी अपुरा पडल्याने त्याला काहीसा उशीर झाला होता. त्यात कोरोना काळामुळेदेखील ही प्रक्रिया लांबली होती. आता निविदा प्रक्रिया झाल्याने चिखलोली स्थानकाला मुर्त स्वरूप येणार आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर