शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

भार्इंदरमध्येही घराघरात दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Published: July 06, 2017 6:04 AM

नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : नवीन जलवाहिन्यांची काटेकोरपणे स्वच्छता न करताच पाणी सोडण्यात आल्याने केवळ मीरा रोड पुरते नव्हे तर संपूर्ण मीरा- भार्इंदरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी भार्इंदर पश्चिम भागातही गढूळ पाणी आले. शहरभर दूषित पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीरा रोडच्या शीतलनगर, शांतीपार्क भागात सोमवारपासून दूूषित पाणी पालिकेच्या जलवाहिन्यांमधून येऊ लागले. रहिवाशांनी तक्रारी करूनही पालिकेकडून समाधानकारक उत्तर वा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परंतु दूषित पाणीपुरवठा केवळ शीतलनगर वा शांतीपार्क पुरताच न होता भार्इंदर पूर्व, मीरा रोडमध्येही दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने होत आहे. बुुधवारी भार्इंदर पश्चिम, मुर्धा परिसरात दुर्गंधी पाणी आले. संपूर्ण शहरात दूषित पाणीपुपरवठा होत असताना महापालिकेने मात्र सोयीस्कर डोळेझाकच चालवली. पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने सत्यस्थिती जाहीर केलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळासह संतापाची लाट उसळली आहे. वास्तविक ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेतंर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तर शहरातही अंतर्गत मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. लहान असो वा मोठी जलवाहिनी टाकल्यानंतर त्याची काटेकोर स्वच्छता करणे अत्यावश्यक असते. परंतु महापालिकेने जलवाहिन्यांच्या स्वच्छतेबद्दल सोयीस्कर दुर्लक्षच केले. पूर्णपणे जलवाहिन्या साफ झालेल्या नसतानाही त्यातून नागरिकांना पाणी सोडण्यात आले. दूषित पाणी हे उकळून पिण्यायोग्य तर सोडाच आंघोळ व कपडे धुण्यासाठीही नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. बाटलीबंद पाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. गढूळ पाणी इमारतींच्या तळ तसेच गच्चीवरील टाकीत तर गेलेच पण रहिवाशांच्या घरातील टाक्यां मध्ये देखील गेले. त्यामुळे टाक्या साफ करण्याचा नाहक भूर्दंड बसणार आहे. मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेतली. या वेळी शहरातील दूषित पाणी पुरवठ्याबद्दल आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असताना त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सत्तधारी व प्रशासन या पैकी कुणीच नव्हते. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून टाक्यांची सफाई करण्यासाठी पडणारा भूर्दंड पालिका देणार का ? असा सवाल सुर्वे यांनी केला आहे. पावसाची सुरूवात व साकेत- ओवळा दरम्यान ७५ दशलक्ष लिटर पाणी योजनेतील नवीन जलवाहिनी सुरू केल्याने एक ते दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. क्लोरीन टाकले असले तरी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. - सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा कळस असून दूषित पाण्याने संपूर्ण शहराला वेठीस धरले आहे. नव्या जलवाहिन्या पूर्णपणे स्वच्छ केल्याशिवाय त्यांचा वापर करायला नको होता. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. - रोहिदास पाटील, नगरसेवक. पिण्यासाठी वा जेवणासाठी तर सोडाच पण भांडी, कपडे, आंघोळ आदी कामांसाठी देखील वापरू शकत नाही इतके घाणेरडे पाणी येत आहे. स्वच्छ पाणी आणायचे तरी कुठून ? पालिकेने टँकरने पाणी द्यावे.- रंजना पाटील, गृहिणी.