शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात ४५५ कोरोना रुग्ण; शहरात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 03:14 IST

मीरा-भाईंदरने गाठली शंभरी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढताच असल्याचे दिसत आहे. मंगळवारी ही जिल्ह्यात ३१ रु ग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात शंभरी गाठणारी मीरा-भाईंदरही ठाणे महापालिकेपाठोपाठची दुसरी महापालिका ठरली आहे. ठामपा क्षेत्रात सोमवार पाठोपाठ मंगळवारीही दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या एकूण १७ झाली आहे.ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची एकूण संख्या ही ४५५ इतकी झाली असून मंगळवारी नव्याने जे ३१ रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक १२ रुग्ण हे मीरा भार्इंदर येथे सापडले आहेत. यामुळे तेथील संख्या ही १०६ इतकी झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीतही ७ नवे रु ग्ण आढळले असून तेथील रु ग्णांचा आकडा ८५ झाला आहे. यात डोंबिवलीत ४ तर ३ रुग्ण कल्याण रुग्ण मिळून आले आहेत. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह ६ महिलांचा समावेश आहे. तर एक ६२ वर्षीय पुरु ष आहे. ठामपात ७ आणि नवीमुंबईत ५ नवे रु ग्ण आढळून आले आहेत. ठामपातील रु ग्णांची संख्या ही १५५ झाली आहे तर नवी मुंबई येथील रु ग्णांची संख्या ७४ झाली आहे. त्याच बरोबर भिवंडीत दोन नवे रु ग्ण समोर आल्याने तेथील संख्या ही ५ झाली आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर तसेच ठाणे ग्रामीण येथे मंगळवारी एक ही रु ग्ण आढळून आलेला नाही.१७ रुग्णांचा मृत्यूठाणे महापालिका हद्दीतील ७७ आणि ५८ वर्षीय अशा दोन पॉझिटिव्ह रु ग्ण असलेल्या महिलांचा सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी मृत्यू झाला आहे. एकीचा मृत्यू जिल्हा रु ग्णालयात तर दुसरीचा मृत्यू खासगी रु ग्णालयात झाला आहे. जिल्हा रु ग्णालयातील महिलेला रविवारी मध्यरात्री उपचारार्थ दाखल केले होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेला १४ एप्रिल रोजी खासगी रु ग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे.कल्याण-डोंबिवलीत सात नवे रुग्णकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवारी सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीत बाधितांची संख्या ८५ झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील सहा महिन्यांची बालिका, ३५ वर्षांची महिला, ६२ वर्षांचा वृद्ध, ५३ वर्षांचे गृहस्थ तसेच कल्याण पूर्वेतील २३ वर्षांचा तरुण, ३० वर्षांची आणि ४८ वर्षांची महिला यांचा सामवेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी २९ रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजमितीस एकूण ५३ रुग्ण उपचार घेत आहेत.‘त्या’ नागरिकांनी क्वारंटाइन करावे!कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील रिलायन्स मार्ट येथे काम करणारा इसम १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या मार्टमध्ये १ ते २० एप्रिल दरम्यान काम करणाºया कर्मचारी व त्याठिकाणी गेलेल्या नागरिकांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घ्यावे. त्यांना सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी नजीकच्या तापाच्या दवाखान्यात अथवा महापालिका रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.भिवंडीत दोन रु ग्ण पॉझिटिव्हभिवंडी : शहरातील वेताळपाडा येथील दोन महिलांचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे भिवंडीत रुग्णांची संख्या शहरात आता पाच, तर ग्रामीणमध्ये तीन अशी संख्या आठवर गेली आहे.शहरातील वेताळपाडा येथे ५३ वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर ठाणे सिव्हिल रु ग्णालयात पाठवले आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तींना भिवंडी येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवले आहे. वेताळपाडा परिसरही मनपाने सील केला होता. मालेगावहून आलेल्या व्यक्तीच्या घरातील त्याची ४५ वर्षीय पत्नी व २३ वर्षीय सून अशा दोघींचे अहवाल पॉझिटिव्ह आले,.आतापर्यंत भिवंडीत कोरोनाने शिरकाव केला नव्हता. आता भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे.उल्हासनगरमध्ये एक रुग्ण सापडलाउल्हासनगर : मुंबई येथील खासगी रुग्णालयात काम करणाºया उल्हासनगरमधील एकाला लागण झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाने त्याच्या पत्नीसह त्याच्या संपर्कात आलेल्या १५ पेक्षा जास्त जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच परिसरात तातडीने आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. या रुग्णाची मुंबई येथे नोंद असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.देशातील सर्वाधिक घनतेचे शहर कोरोनामुक्त असल्याने सर्वत्र कौतुक होत होते. मात्र, आता मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात काम करणाºया व्यक्तीला कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. खबरदारी म्हणून पूर्वेतील एक भाग सील केला असून सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच, त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह १५ पेक्षा जास्त जणांना विलगीकरण केंद्रात ठेवल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. या परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण सुरू आहे.. यापूर्वी संसर्ग झालेली एकमेव महिला पूर्ण बरी झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस