शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:31 AM

आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत तब्बल एक लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, जिल्ह्यासाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. एकूण एक लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत तीन हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा मृत्युदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनांसमोर आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातही मार्चपासूनलॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये त्याचा फैलाव जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी होताना दिसून आला. जून आणि जुलैमध्ये तर रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही मिळणे मुश्कील होऊन बसले होते. परंतु, जुलै महिन्याच्या मध्यानंतर आणि आॅगस्टमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक कमी होऊ लागली.

जिल्ह्यातील महापालिकांनी केलेल्या उपाययोजना, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया आदींसह पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय मंडळींनी घेतलेली काळजी, नागरिकांप्रति केलेली जनजागृती यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बºयाच प्रमाणात यश आले आहे. जुलैपर्यंत प्रतिदिन दीड हजार ते दोन हजार रुग्ण आढळत होते. परंतु, आॅगस्ट महिन्यात ही संख्या खाली आली आहे. सोमवारी जिल्ह्यात ८५९ रुग्ण आढळले आहेत. या यशाचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. आता मृत्युदर रोखण्यासाठीही ठाणे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यात एका कोविड सेंटर रुग्णालयापाठोपाठ आता कळवा, मुंब्य्रातही हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनामुक्तीठाणे 22004कल्याण-डोंबिवली 23095नवी मुंबई 19668मीरा-भार्इंदर 9825उल्हासनगर 7059भिवंडी 3612अंबरनाथ 4231बदलापूर 3493ठाणे ग्रामीण 7075

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या