शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन लागू झाल्यास जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:55 AM

निर्बंधांवर भर द्यावा : हाॅटेल व्यावसायिक

- जितेंद्र कालेकरठाणे : आधीच सलग सहा ते सात महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. पुन्हा असाच लॉकडाऊन झाल्यास हॉटेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा कडक निर्बंध व्हावेत, अशी अपेक्षा ठाण्यातील हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी लॉकडाऊनबाबत आपले मत मांडताना म्हणाले की, सध्या हॉटेल व्यवसाय हे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. रात्री आठनंतर ते बंद केले जातात. त्यामुळे आधीच हॉटेल व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. सरसकट टाळेबंदीपेक्षा मास्क घातला नाही, सामाजिक अंतराचे आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर अशा लोकांवर जरूर कारवाई केली जावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २२ मार्च २०२० पासून हॉटेल, उपाहारगृह बंद ठेवले होते. सलग सात महिने ते बंद राहिल्यामुळे हॉटेल व्यवसायाला उतरती कळा लागली होती. अनेक जण कर्जबाजारी झाले. काहींनी आत्महत्या केली. त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांचे हाल झाल्याच्या वेदना शेट्टी यांनी व्यक्त केल्या आहेत.ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनची आवश्यकता आहे की नाही, यावर जाणकार मंडळीच भाष्य करू शकतील. पण लोकांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे. कोणाचाही रोजगार न बुडता निर्बंध आणले गेले पाहिजेत. तरीही लॉकडाऊन लादले गेल्यास उत्पन्नाचे साधनच बंद होऊ शकते. त्यामुळे मग जगायचे कसे, असाही यक्ष प्रश्न असल्याचे अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले. यावर अवलंबून असलेले शेकडो कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच हॉटेल मालक आणि चालक अशा सर्वांचेच हाल होण्याची भीतीही हे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. नियम कठोर करावेत लॉकडाऊन होऊ नये यासाठी काही अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिकांकडून नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी प्रशासनानेही मोठी मोहीम उघडली पाहिजे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नियम आणखी कडक केले जावेत, असा सल्लाही ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी यांनी दिला आहे.