शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

coronavirus: 18 दिवसांच्या लॉकडाऊन काळात मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचाचण्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 15:04 IST

मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत  पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसांच्या कालावधीत केल्या आहेत . 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये 30 जून पर्यंतच्या मागील 3 महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या 10 हजार 423 आणि कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या 2364 इतकी होती . परंतु लॉकडाउनच्या जुलैच्या अवघ्या 18 दिवसांच्या कालावधीत तब्बल 8 हजार 878 चाचण्या करण्यात येऊन 2 हजार 555 रुग्णांना बरे करून घरी सोडले आहे . कोरोना चाचणी व रुग्ण बरे होण्याचे 18 दिवसातील प्रमाण हे विक्रमी असून दिलासादायक आहे . पण त्याच बरोबर या 18 दिवसात 3096 नवे कोरोना रुग्ण शोधून काढण्यात आले व 74 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे . 

मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत  पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसांच्या कालावधीत केल्या आहेत . 

18 जुलै पर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 422 तर यातून बरे झालेल्यांची संख्या 4 हजार 919 इतकी आहे . कोरोनाने आता पर्यंत शहरात 219 लोकांचा बळी घेतला आहे . नव्याने नियुक्त केलेले आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आल्या पासून सर्वेक्षण , कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासह रुग्णांच्या उपचारावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे आकडेवारी वरून दिसून आले आहे . 

जून अखेरच्या गेल्या तीन महिन्यात कोरोना तुन बरे होणारे 2364 रुग्ण होते . परंतु जुलैच्या 18 दिवसात तब्बल 2 हजार 555 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत . यावरून पालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले जात आहे . कारण रुग्ण बरे होण्याची हि अवघ्या 18 दिवसातील संख्या विक्रमी अशीच आहे . 

परंतु कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे . 3 महिन्यात 145 रुग्णांचे मृत्यू झाले होते तर गेल्या 18 दिवसात तब्बल 74 लोकांचा बळी गेला आहे . कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील गेल्या 18 दिवसात दुप्पट झाली आहे . मागील 3 महिन्यात कोरोनाचे 3 हजार 326 इतके रुग्ण होते. परंतु गेल्या 18 दिवसातच तब्बल 3 हजार 96 रुग्ण सापडले आहेत . चाचण्या वाढल्या आणि चेस द व्हायरस हि मुंबईच्या धर्तीवर राबवलेल्या मोहिमे मुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले .

 कोरोनाचा विषाणू व संसर्ग रोखायचा असेल तर मास्क घालणे , गर्दी टाळून अंतर ठेवणे आणि नाका तोंडाला हात स्वच्छ केल्या शिवाय लावू नये आदी निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने केले पाहिजे . तसेच कोरोना झालेली व त्याच्या संपर्कातील शेवटची व्यक्ती शोधून काढणे व अलगीकरण करून उपचार करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक