शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

CoronaVirus News: रुग्ण बाधित होण्याच्या दरात घट; अंबरनाथमधील दिलासादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:52 AM

पालिका प्रशासनाने राबविल्या विविध उपाययोजना

अंबरनाथ : शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी, याकरिता पालिका प्रशासनामार्फत विविध पातळ्यांवर योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात ५१.२९ टक्के असलेला रुग्ण बाधित होण्याचा दर हा कमी होऊन आॅक्टोबरमध्ये २६.४६ टक्क्यांवर आला आहे.शहरात एकूण २५ हजार ११७ चाचण्या करण्यात आल्या असून बाधित रुग्णांची संख्या आजवर सहा हजार ६४७ एवढी झाली आहे. त्यातील सहा हजार १९ रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात सर्व नागरिकांचे झालेले प्राथमिक आरोग्य सर्वेक्षण, त्यामुळे बाधितांची वेळीच झालेली ओळख आणि त्यांना योग्य वेळी मिळालेले उपचार यामुळे शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दर हा निम्म्यावर आला आहे. यामुळे शहराच्या दृष्टीने ही एक सकारात्मक बाब आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण रुग्णसंख्येपैकी ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे आजवर आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ ५.८३ टक्केच रुग्ण आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा ९०.५५ टक्के इतका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील रुग्णालयात लवकरच ५०० आॅक्सिजन बेडची सुविधाही करण्यात येत आहे, जेणेकरून सध्या उपचार घेत असलेले आणि भविष्यात रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना आॅक्सिजनअभावी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्याचबरोबर सध्या या रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची असून तीही वाढवून ७०० खाटांपर्यंत वाढवण्यात येत आहे.रुग्णांना मिळाले वेळेत उपचारकोरोना नियंत्रणात यावा, याकरिता पालिका प्रशासनाकडून वाढविलेले चाचण्यांचे प्रमाण, अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर दिलेला भर, बाधित रुग्णांना वेळीच मिळालेले उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दरदेखील कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.भिवंडीत एक लाख ६४ हजार कुटुंबांचे सर्वेक्षणभिवंडी : कोरोनावर उपाययोजना म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सरकारी स्स्तरावर राबविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. भिवंडी महापालिकेने ही मोहीम शहरभर राबविली असून आतापर्यंत एक लाख ६४ हजार ४१३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.पालिकेचे ३५० कर्मचारी व अधिकारी या सर्वेक्षणात कार्यरत आहेत. भिवंडी पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव सध्या आटोक्यात आला असला, तरी गुरुवारी शहरातील बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ३१७ वर पोहोचली आहे. मात्र, आतापर्यंत चार हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून ३१९ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.सध्या शहरातील ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शहरातील नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नसल्याने शहरातील कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या