शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

coronavirus: ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंधांची वेसण, नियम मोडाल तर आस्थापना होतील सिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 4:06 PM

coronavirus in Thane : नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.

ठाणे  - राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स व इतर आस्थापना या रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत. तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले. (Restrictions in Thane again for Stop coronavirus )बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी जे नियम आखण्यात आले होते, तेच नियम आताही लागू असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स, दुकाने, बाजारपेठामधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने काढलेल्या आदेशाची माहिती या आस्थापनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली असून त्यांनी देखील नियमांचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदींठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रवेशाच्या वेळी प्रत्येकाचे तापमान तपासून प्रवेश, लक्षणो असणा:यांना प्रवेश नाही, हॅन्ट सॅनिटाझर प्रत्येक ठिकाणी प्रवेशद्वारावर असावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टेसिंग, शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृह, रेस्टॉरेन्टमध्ये प्रवेश देतांना घालून दिलेल्या र्निबधाचे उल्लघन होणार नाही याची योग्य ती खबरदारी मॉल व्यवस्थापनाकडून घेण्यात यावी.कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास त्या ठिकाणच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु आता त्याठिकाणी 5क् माणसांनाच परवानगी असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी देखील २० माणसांचीच परवानगी असणार आहे.गृह विलगीकरणासाठी निर्बंधासह परवानगीस्थानिक प्रशासनास व वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखाली गृह विलगीकरण कवण्यात येईल. १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराना पॉझीटीव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरन्टाइनचा शिक्का मारला जाणार, तसेच त्याच्या घरातील इतर नागरीकांना घराबाहरे जाणो टाळावे व मास्कचा वापर करावा या आदेशाचे उल्लघंन केल्यास गृह विलीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीला तत्काळ कोवीड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल.

आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनात ५० टक्के उपस्थिती आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी किंवा शासकीय कार्यालयांमध्ये देखील पूर्वीप्रमाणे 5० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल याची जबाबदारी संबधींत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील ऑनलाईन बुकींग करुन दर्शन घ्यावे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्च २०२१ र्पयत बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु या आदेशाचे उल्लघंन झाल्यास संबधींत आस्थापना सील केल्या जातील. परंतु जो र्पयत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोर्पयत त्या आस्थापना सुरू करता येणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घेऊनच त्या आस्थापना सुरु करता येतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे