शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 00:17 IST

वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.

मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, म्हणून एकीकडे गर्दीची ठिकाणे बंद केली जात असताना भाईंदर पश्चिमेतील रविवारचा आठवडा बाजार गजबजला होता. सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिलेले आदेश डावलून भरलेल्या बाजाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.नव्याने आलेले प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी महिनाभरापासून कारवाईच गुंडाळून टाकली आहे. पोलीसही दुर्लक्ष करत असल्यामुळे या बाजारावर कोरोनाचाही परिणाम झालेला नाही. गावाचे शहर झाले तरी बाजारवसुली करणाऱ्या ठेकेदारांना आणि त्यात हितसंबंध गुंतलेल्यांनेच हा बाजार रविवारी भरला.भाईंदर रेल्वेस्थानकापासून भाईंदर शहरच नव्हे तर मुर्धापासून थेट उत्तन-चौक व गोराईपर्यंत जाणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. हा वाहतुकीसाठीचा एकमेव मार्ग असताना रविवार बाजारच्या आड फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांची संख्या आठवड्यागणिक वाढलीआहे.आधीच बेकायदा पार्किंग, दुकान आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. त्यातच रविवार बाजारामुळे भाईंदर पोलीस ठाण्यापासून शिवसेना गल्ली नाकयापर्यंतचा मुख्य रस्ता, दुसरीकडे नगरभवनपर्यंत आणि महापालिका मुख्यालयामागची गल्ली बेकायदा फेरीवाल्यांमुळे व्यापली आहे.पालिकेचे बसस्थानकही यांनी बळकावले आहे. शहराचा मुख्य मार्ग असल्याने एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन लोक अडकून पडतात. आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहनही येथून नेणे अशक्य बनले आहे. त्यातच भुरटे चोर, पाकीटमारांसह महिला-मुलींची छेड काढण्याचे प्रकार नेहमीचेच झालेले आहेत. रविवारचा बाजार सायंकाळपर्यंत बस्तान मांडून बसत आहे.बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर तसेच फेरीवाल्यांनी टाकलेला कचरा याचा उपद्रव लोकांना सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०१५ च्या महासभेमध्ये भाजी आणि सुकी मासळीविक्रेत्या स्थानिकांना वगळून अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला होता.तोही बासनात गुंडाळला आहे. फेरीवाल्यांशी तसेच बाजारवसुली ठेकेदाराचे नगरसेवक, राजकारणी आणि महापालिकेशी अर्थपूर्ण लागेबांधे असल्याशिवाय पालिका संरक्षण देणे शक्य नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत.रविवार बाजारासंबंधी आयुक्तांशी चर्चा केली आहे. या बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने रविवार बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.- डॉ. शशिकांत भोसले, पोलीस उपअधीक्षक, भाईंदरकोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि रहदारी-वाहतुकीला होणारा अडथळा विचारात घेता पालिका रविवार बाजारावर कारवाई करण्यात येणार आहे.-चंद्रकांत डांगे, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाMira Bhayanderमीरा-भाईंदर