शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

प्रमुख उमेदवारांचा प्रचार खर्च १५ लाखांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:37 IST

उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये खर्च केला आहे.

ठाणे : उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी साधारणत: प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च मुख्यत: रॅली आणि चौकसभांवर झाला आहे. अपक्ष उमेदवारांकडून बऱ्याच वेळा खर्च सादर केला जात नाही. त्यामुळे त्यांना खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत सांगावे लागत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी हे तीन मतदारसंघ येतात. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आतापर्यंत साधारणत: १० ते १५ लाखांपर्यंत खर्च केला आहे. यामध्ये चौकसभा, रॅली, कार्यकर्त्यांना वाटलेले झेंडे, चिन्हे, टोप्या आदी प्रचार साहित्यावर केलेला खर्च आणि प्रचारासाठी वापरण्यात येणाºया वाहनांचा खर्चही दाखवला जात आहे. त्या तुलनेत इतर पक्षांच्या उमेदवारांनी सात ते आठ, तर अपक्ष उमेदवारांनी एक ते दीड लाखापर्यंत खर्च केल्याचा तपशील सादर केला आहे.>सहा पथके तैनातठाणे लोकसभा मतदारसंघात येणाºया विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये उमेदवारांकडून होणाºया खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी सहा पथके आहेत. त्यात्या पथकांद्वारे उमेदवारांकडून होणाºया खर्चावर लक्ष ठेवले जात आहे. रॅली अथवा इतर प्रचार कार्यक्रमातील खर्चाचा अंदाज ही पथके नोंदवत आहेत..खर्चाचा तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावली जाणार आहे. नोटीसीला उत्तर न दिल्यास तीन वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.

टॅग्स :thane-pcठाणेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019