शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

By सदानंद नाईक | Published: May 28, 2023 7:13 PM

शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले.

उल्हासनगर : शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे. तसेच आमदार किणीकरसह अन्य जण मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे मत कार्यक्रमात व्यक्त केले. उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कॅम्प नं-५ परिसरात शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी केले होते. कार्यक्रमाला पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे आदी जण उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख यांचा खून झाला असून मटकी जुगाराच्या वादातून खून झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणावरून आव्हाड यांनी जिल्ह्या क्राईम कॅपिटल झाल्याची टीका त्यांनी केली. तसेच शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर मातोश्रीच्या संपर्कात असून त्यांना मातोश्रीच्या प्रवेश दिला जाणार नसल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. 

शहर राष्ट्रवादीत कलानी व गंगोत्री असे गट पडले असून भारत गंगोत्रीसह समर्थकांना पक्ष प्रवेश व पदाधिकारी बैठक कार्यक्रमाला आमंत्रित केले नाही. असा आरोप गंगोत्री समर्थक करीत आहेत. तसेच शहरभर लावलेल्या पोस्टर्सवर गंगोत्री यांना स्थान देण्यात आले नाही. पक्षातील वादावर आव्हाड यांनी टाळले असून परांजपे यांनी पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. कलानी यांच्यावर उल्हासनगर विधानसभा संघासह कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचा पदभार देण्याची घोषणा यावेळी केली. पदाधिकारी बैठकीच्या पोस्टर्सवर शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी यांचे फोटो झळकले आहे. मात्र बैठकीला पप्पु कलानी व ओमी कलानी यांनी दांडी मारल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. तसेच पक्षातील वाद मिटल्यास पक्षाची शक्ती वाढणार असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड