शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 03:01 IST

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही.

अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसी प्रशासनाने गुरुवारपासून केलेल्या लॉकडाऊनला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळाला. बजारपेठांमधील दुकाने बंद होती. नागरिकांनी घरी राहणेच पसंत केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. सकाळी कामावर जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकात नोकरदारांच्या रांगाही लागल्या नाहीत. त्यामुळे एसटी बस रिकाम्याच धावल्या.

कोरोना रोखण्यासाठी सरकारने मार्चअखेरीस लॉकडाऊन जाहीर केले होते. सुरुवातीला नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. त्यावेळी ई-पास व त्यासंबंधित प्रक्रियेसाठी मजुरांची महापालिका व पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी दिसू लागली. पुढे अनलॉक झाल्यानंतर अनेक व्यवहार सुरू झाले. नोकरदारही कामावर जाण्यासाठी एसटी बससाठी गर्दी करू लागले. नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर वावरत होते. मात्र, वाढत्या रुग्णांमुळे गुरुवारपासून केलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.

केंद्र, राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर पोर्ट ट्रस्ट, टपाल, राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील या भीतीने अनेक नोकरदार कामावर जाण्यासाठी निघाले नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधी चौकात त्यांच्या रांगा लागल्या नाहीत. सकाळच्या सत्रातील अल्प प्रतिसाद पाहून एसटी नियंत्रकांनी डोंबिवलीत जादा बस न पाठवण्याची विनंती नियंत्रण कक्षाला केली. ३० जूनपर्यंत सकाळी डोंबिवलीतून ९० ते १०० बस सुटत होत्या. परंतु, गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मंत्रालय, ठाणे, कल्याण मार्गांवर ५० बस सुटल्या. त्याही प्रवाशांअभावी रिकाम्या धावल्या.

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही. सकाळच्या वेळेत तुकारामनगर, शेलार नाका, फडके पथ, या भागात काही भाजी, फळविक्रेते बसले होते. महापालिकेने त्यांना समज देऊन पथारी उचलण्यास सांगितले. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही अर्धे शटर उडघण्यात आली होती. किराणा माल दुकानदारांनी सामानाची होम डिलिव्हरी दिली. मात्र, लॉकडाऊनचा फटका बसल्याने किराणा दुकानदार, औषध आणि भाजी विक्रेते आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अत्यावश्यक सेवेसाठीच्या आॅनकॉल सेवेतील रिक्षा रस्त्यावर दिसून आल्या. सकाळी ९ नंतर रामनगर, विष्णूनगर भागात पोलिसांनी रिक्षा फिरवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.ठाकुर्ली पुलानजीक वाहनतपासणीपोलिसांनी शेलारनाका, ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात नाकाबंदी केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाºयांना पोलीस परतवून लावत होते. केवळ वैद्यकीय व सरकारी असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच पोलीस सोडत होते. नाकाबंदीमुळे पुलाच्या परिसरात पूर्व-पश्चिमेस दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून तुरळक सुरू असलेली वर्दळही सकाळी ११ नंतर कमी झाली.

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली