शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठाण्यात महायुतीला रिपाइंचा धक्का, आघाडीचा प्रचार करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 04:50 IST

रिपाइं आठवले गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या झालेल्या अपमानानंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने महायुतीविरोधात बंडांचा झेंडा हाती घेतला आहे.

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी रिपाइं आठवले गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या झालेल्या अपमानानंतर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने महायुतीविरोधात बंडांचा झेंडा हाती घेतला आहे. मागील १० वर्षे आम्ही शिवसेनेबरोबर आहोत. मात्र, त्यांची मनुवादीवृत्ती अद्यापही बदलली नसल्याचा आरोप रिपाइंचे जिल्हा प्रवक्ते विकास चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. यामुळेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सेनेविरोधात प्रचार करून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, पुरोगामी विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार सर्व रिपाइं कार्यकर्ते करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी सायंकाळी राजन विचारे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रिपाइंचे ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या जिल्हाध्यक्षांना मागच्या रांगेत बसवले. त्यामुळे रिपाइंचे पदाधिकारी नाराज झाले. त्यानंतर जिल्हाध्यक्षांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. प्रचारपत्रके, जाहीरनाम्यावर डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांसह पक्ष जिल्हाध्यक्षांंच्या फोटोस योग्य सन्मान न मिळण्यासह वारंवार आमच्या नेत्यांचा अवमान होत आहे. प्रचाराच्या पत्रकार परिषदा, चौकसभांचे निमंत्रण दिले जात नाही. त्यामुळे, आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो आहोत.

जिल्हाध्यक्षांचा वारंवार होणारा अपमान आम्ही सहन करत नसल्याचे सांगून महायुतीविरोधात उघडउघड बंड पुकारल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यावर कारवाई झाली तरी, तिला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांत भ्रष्टाचार सुरू आहे. अशांसोबत आम्ही कसे जायचे, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आजपासूनच आम्ही जितेंद्र आव्हाडांसह आनंद परांजपे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक राजन विचारे यांच्यावर नाराज आहेत. वाघबीळ गावातील रहिवाशांनी तर त्यांची रॅली पिटाळून लावली. त्यानंतर, आता महायुतीचा घटक असलेल्या रिपाइंच्या बंडामुळे राजन विचारे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महायुतीतील अंतर्गत वाद होता, तो सोडवण्यासाठी चर्चा सुरू होती. परंतु, मला न सांगता कार्यकर्त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे, त्याबाबत रामदास आठवले यांच्या कानांवर घातले जाईल. शिवाय, त्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्यानुसार त्यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. - रामभाऊ तायडे, जिल्हाध्यक्ष, रिपाइं, आठवले गट

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवलेthane-pcठाणेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019