शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

मुरबाड तालुक्यातील घरांचे वादळी पावसाने केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:16 IST

नेत्यांकडून साधी चौकशीही नाही; कुटुंबे आली रस्त्यावर

मुरबाड : गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी तालुक्यातील शिरोशी, टोकावडे, शेलगाव, माळ, वैशाखरे अशा सुमारे पंचवीस ते तीस गावात झालेल्या वादळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले. या घरांमध्ये राहणारी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अगोदरच रोजगार तसेच अन्नधान्यापासून वंचित असणारी कुटुंबे उघड्यावर दिवस काढत आहेत.पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येकजण पावसाळ््यापासून घराचा बचाव करण्यासाठी काळजी घेत असतो. टोकावडे परिसरातील शिरोशी, वेळुक, माळ, शेलगाव, वैशाखरे आणि धसई परिसरातील अनेक गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी वादळी पावसाने थैमान घातले. यात घरांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. अगोदरच रोजगारासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांपुढे निवाºयाचा प्रश्न उभा राहिला असून मागील महिन्यात मतांसाठी फिरणाºया नेत्यांनी बेघर कुटुंबांची साधी भेटही घेतलेली नाही.या परिसरातील नागरिकांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जरी तहसीलदारांनी दिले असले तरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे त्यांना तात्काळ मदत देऊन निवाºयाची सुविधा उपलब्ध केव्हा होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.पंचनामे करण्याचे दिले आदेशनैसर्गिक आपत्तीत शेकडो घरांचे नुकसान होऊन काही कुटुंबे रस्त्यावर आली असल्याने त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत. ते मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून बांधकाम विभागाच्या अहवालानुसार भरपाई देण्यात येईल, असे तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले. दरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी घटनास्थळी भेट द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केली आहे.

टॅग्स :murbadमुरबाड