शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

धोकादायक भाग कोसळला

By admin | Published: July 02, 2017 6:04 AM

ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत उरलेल्या इमारतीच्या काही भागात दोन कुटुंबे राहत आहेत. शहराजवळ खाडीपार-खोणी ग्रामपंचायत हद्दीत एकता चौकामध्ये आरफात शेख यांच्या मालकीची दोन मजली इमारत आहे. या इमारतीस ग्रामपंचायतीने धोकादायक जाहीर करूनही मालकाने ती पाडली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इमारतीला धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्रीच्या वेळी इमारतीत पाणी घुसून पहिल्या मजल्यावरील काही भाग व भिंत अचानक कोसळली. रात्रीच्या वेळी इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने बंद असल्याने जीवितहानी टळली. इमारतीत पागडीने राहत असलेल्या दोन कुटुंबांची पर्यायी व्यवस्था केली. परंतु, दुसऱ्या मजल्यावरील दोन कुटुंबांनी अद्याप आपल्या खोल्या सोडलेल्या नाहीत. धोकादायक इमारत असूनही इमारतीत वीजपुरवठा सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. या दुर्घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलाने अथवा संबंधित पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना तसेच ग्रामीण आपत्ती व्यवस्थापनास न दिल्याने महसूल विभागाला तीन तासांनी माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.भिवंडीतील धोकादायक इमारतींचा विषय दरवर्षी पावसाळ््यात समोर येतो आणि नंतर त्यावर काहीही कारवाई होत नाही. गेल्यावर्षीही दोन इमारती कोसळल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. यंदा मे महिन्यातच राज्य सरकराने अशा इमारतींची वर्गवारी करून त्या तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेतून समोर आले. मालकाने ही इमारत न तोडल्याने आणि त्यासाठी पंचायतीने त्याच्याकडे आग्रह न धरल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. पण त्यातून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही समोर आला आहे.