शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

टोलमुक्तीसाठी भाजपा नगरसेवकाची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:34 AM

राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा स्थानिकांना मुलुंड येथील टोल बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपाच्या नगरसेवकाने आंदोलन केले.

ठाणे : राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा स्थानिकांना मुलुंड येथील टोल बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपाच्या नगरसेवकाने आंदोलन केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नगरसेवक भरत चव्हाण यांनी या टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी आपल्याच सरकारविरोधात त्यांनी नागरिकांच्या मदतीने घोषणाबाजीही केली.सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे, असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वत:कडे असतानादेखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात कोपरी, आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोलपासून १० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असतानासुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्तीने टोल वसूल केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. कोपरी, पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ, अशी घोषणा केली होती. कोपरीकरांनी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी टोल न भरता मुंबईत शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु, सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊनही कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न पालकमंत्र्यांनी अपुरे ठेवल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.>साडेचार वर्षांत निराशाकाही दिवसांपूर्वी या टोलमुक्तीसाठी चव्हाण यांनी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर, आता हे आंदोलन करण्यात आले. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशा आल्याने कोपरीकरांनी हे आंदोलन केले.