शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

‘बेकायदा बांधकामे नियमित करणे हा अवमान’

By admin | Published: March 14, 2016 1:41 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी यापुढे कोणतेही बांधकाम नियमित करण्यात येऊ नये

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी यापुढे कोणतेही बांधकाम नियमित करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले असताना राज्य सरकार बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय कसा घेऊ शकते. सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूने घेतला आहे. या निर्णयाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार असल्याचा दावा याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केला आहे. डिसेंबर २०१५ पूर्वीची ठाणे जिल्ह्यातील २ लाख बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ६७ हजार बांधकामांचा समावेश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गोखले यांच्या याचिकेवर २८ जानेवारी २००८ रोजी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, महापालिका क्षेत्रातील कोणतेही बेकायदा बांधकाम नियमित करण्यात येऊ नये. महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मनपा क्षेत्रात ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याची माहिती दिली होती.नियोजन नसताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट असताना असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. कारण, कायदे पूर्वलक्षीप्रभावाने तयार करता येत नाहीत. पुढे होणारी बेकायदा बांधकामे रोखता येऊ शकतात. मागील काळात झालेल्या बेकायदा बांधकामांचे काय करणार, हे आधी स्पष्ट करावे लागेल. २०१० सालच्या अहवालानुसार सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता कल्याण-डोंबिवलीत होती. दरएकरी जागेत १७०० लोक राहत असल्याचा अहवाल होता. इतक्या जास्त घनतेच्या शहरात सोयीसुविधा पुरविल्या गेलेल्या नसताना बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेऊन काय साध्य होणार, असा सवाल गोखले यांनी केला. उल्हासनगरच्या धर्तीवर माणुसकीच्या नावाखाली ही बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात उल्हासनगरात काय झाले, हे सगळ्यांनाच माहीत आहे. २००६ साली राज्य सरकारने विशेष अध्यादेश काढून बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. प्रत्यक्षात एकही बांधकाम नियमित झालेले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका नागरिकांना पुरेशा नागरी सोयीसुविधा पुरवू शकत नाही.अस्तित्वात असलेल्या सुविधा अपुऱ्या आहेत. सुविधांची वानवा असून सात लाख लोकवस्तीला पुरेल इतकाच पाणीसाठा असताना त्यावर १५ लाख लोकसंख्येची तहान भागवली जाते. त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. घनकचऱ्याचा प्रकल्प महापालिका उभारू शकलेली नाही. तसेच कचरा ओला व सुका असे वर्गीकृत पद्धतीने गोळा करू शकली नाही. पुरेशी प्रसाधनगृहे महापालिका उभारू शकलेली नाही. अस्वच्छ शहर असा शहराचा लौकिक आहे. परिवहन सेवा सक्षम नाही. शहराला पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. एखाद्या गल्लीत रुग्णवाहिका शिरत नाही. साधे स्ट्रेचरवरून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवणे जिकिरीचे होते. अशा परिस्थितीत बेकायदा बांधकामे नियमित केल्याने नागरी सुविधांवर नक्कीच ताण येणार आहे.