शहरं
Join us  
Trending Stories
1
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
2
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
4
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
5
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
6
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
7
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
8
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
9
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
10
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
11
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
12
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
13
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
14
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
15
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
16
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
17
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
18
Suzlon Energy बाबत मोठी अपडेट, एक वृत्त आणि शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
19
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
20
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:45 AM

मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे ...

मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कोट्यवधींचे धान्य बेवारस पडलेले असून त्याची नासाडी हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे आयते कुरण मिळाल्याने भटक्या प्राण्यांनी या धान्य गाेदामाचा ताबा घेतल्याने तालुक्यातील खरेदी-विक्री संघाच्या कारभाराचे सर्वत्र धिंडवडे निघत आहेत. या नासाडीबाबत ‘लाेकमत’ने लक्ष वेधूनही त्याकडे खरेदी-विक्री संघाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाने मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार ८८४ शेतकऱ्यांचे ९३ हजार ४२४ क्विंटल धान्य खरेदी केले. त्यापैकी शेकडो शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे़. हे शेतकरी दररोज खरेदी-विक्री संघाकडे फेऱ्या मारत आहेत. खरेदी केलेले धान्य राईस मिलमध्ये भरडून त्यातून मिळणारा तांदूळ रास्त भाव दुकानाला पुरविला जातो. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याची निगा राखण्यासाठी लागणारी साधनसामग्री व मनुष्यबळ संघाला पुरवले जाते. मुरबाड तालुक्यातील शेतकरी संघाने खरेदी कलेल्या या धान्याची याेग्य काळजी घेतली जात नसल्याने नासाडी हाेत आहे. यासाठी दरमहा लाखाे रुपयांचे गाेदाम भाडे भरले जात आहे. मात्र, या गाेदामाला दरवाजे नसल्यामुळे भटक्या जनावरांनी त्याचा ताबा घेतला आहे, तर उर्वरित धान्य हे उघड्यावर टाकून त्यावर प्लास्टिक टाकले आहे. मात्र, अतिवृष्टीच्या काळात हे हजारो क्विंटल धान्य भिजून सडले आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून गरिबांची पोटाची खळगी भरण्यासाठी साठवलेल्या धान्याच्या प्रकरणी शेतकरी संघावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.