शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By पंकज पाटील | Published: October 10, 2023 7:40 PM

साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.

पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथ पश्चिमेकडील काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईसंदर्भात मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन पाणी कार्यालयाकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेले साखळी उपोषण आज माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत राजकारणासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.

अंबरनाथ पश्चिम भागातील संघटन चौक, बुवापाडा,भास्करनगर आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ  शुक्रवारपासून साखळी उपोषण  सुरू करण्यात आले होते. अखेर  उपोषणाच्या आजच्या पाचव्या  दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या उपोषणास भेट देत उपोषणकर्त्यांचे उपोषण मागे घेतले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी उपोषणकर्ते यांच्या २० पैकी १८ मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासनाचे पत्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते यांना देत उपोषण मागे घेतले. तर आव्हाड यांनी संबधित अधिकाऱ्यांना एक महिन्यांची मुदत देत दिलेल्या आश्वासनानुसार पाण्याचा पुरवठा न झाल्यास परत पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला. तर अंबरनाथ शहरात निवडणुका जवळ आल्यावरच राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम सुरू होते. राजकारण करण्यासाठी पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला

टॅग्स :ambernathअंबरनाथ