शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी उभे राहण्याचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 1:22 AM

दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता

ठाणे : महात्मा गांधींनी १९३० साली केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला स्मरून आम्ही मिट्टी सत्याग्रह करीत आहोत. आमची माती, जमीन, संविधान आणि लोकशाही जपण्यासाठी शेतकरी आंदोलनाला समर्थन देऊन अहिंसात्मक मार्गाने लढण्याचा संकल्प समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांच्या रंगमंचावर कलाकार, कार्यकर्त्यांनी मतकरी स्मृतिमालेच्या कार्यक्रमात केला. 

दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दर महिन्यात घेण्यात येणा-या या स्मृतिमालेच्या मार्च महिन्याच्या नवव्या पुष्पाचा विषय होता ‘मिट्टी सत्याग्रह’. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मोरे हिने केले. प्रास्ताविकात मीनल उत्तुरकर यांनी शेतकरी आंदोलनाची भूमिका विशद केली. कोरोनासंबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करत पार पाडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी एकेक मूठभर माती एका कलशात जमा केली आणि मी मिट्टी सत्याग्रही अशा बॅनरवर स्वाक्ष-या केल्या. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांनी सर्वांना मातीचा टिळा लावला.यावेळी किसननगरच्या मुलामुलींनी अत्यंत अनोखी नृत्य नाटिका सादर करून या विषयाचा महत्त्व प्रभावीपणे मांडले. तर अनुजा लोहार, दुर्गा माळी, प्राची डांगे, अंजली लोहार, मंगम्मा धनगर यांनी यह धरती अपनी है, अपना अंबर है रे.. या गाण्यावर नृत्य सादर केले. सुशांत जगताप, निशांत पांडे, ओंकार गरड यांनी शेतकरी आंदोलनावर त्यांचे विचार मांडले. प्राची डांगे हिने माणसे या अनिल अवचट यांच्या पुस्तकातील दुष्काळाने गरीब शेतकरी यांच्या झालेल्या भयंकर परवडीच्या वर्णनाचे अभिवाचन केले.

मिट्टी सत्याग्रह ठाण्याच्या वस्ती-वस्तींत नेणारमिट्टी सत्याग्रहाचा हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सर्वांना केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करून मिट्टी सत्याग्रहाचा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. 

या वेळी संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शेतकरी कायद्यांबरोबरच सरकार जे कामगार विषयक कायदे आणत आहे ते मालकांच्या बाजूचे असून त्यामध्ये अशा नवीन तरतुदी आहेत की कामगार आपल्या अधिकारांसाठी लढू शकणार नाहीत. असुरक्षित कामगारांची संख्या आताच ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे ती अजून वाढेल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले, ओमकार जंगम, प्रवीण खैरालिया आदींनी मेहनत घेतली.