शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भिवंडी तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचं तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Published: June 28, 2024 5:31 PM

प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले.

भिवंडी: १९५८ मध्ये सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.यापैकी भिवंडी तालुक्यात कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांचे आठ गावे वसविण्यात आली तर त्यानंतर कोयना व्याघ्र प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना २०१२ मध्ये पाच गावे ही सुद्धा भिवंडी तालुक्यात नव्याने वसविण्यात आलेले आहेत. या गावातील पुनर्वसन ग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या विरोधात भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्या आले.

अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे,उपाध्यक्ष अमोल कदम,सल्लगार बळीराम शिंदे,तालुका अध्यक्ष आनंद निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेली या आंदोलनात तालुक्यातील रोहीणे,निवळी,लामज,रामवाडी,करंजवडे,रवदी,चिरंबे,महाळूंगे,माडोशी,कुसापुर मोरणी,पाचगाव या गावातील असंख्य नागरीक सहभागी झाले होते.

कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनिच्या मोबदल्यात खातेदारांना पर्यायी जमीनींचे वाटप करावे, ज्या खातेदारांना अंशतः जमिनी वाटप झाल्या आहेत त्यांना उर्वरित जमिन वाटप करतांना कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द करावी,प्रकल्पासाठी जमिनी संपादित करते वेळी खातेदारांव्यतिरिक्त असलेल्या पोट खातेदारांना जमीनीचे वाटप केले नसल्याने त्यांनाही पर्यायी जमीन वाटप करावे,प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या व्यतिरिक्त खातेदारांच्या जमिनी मुळ ठिकाणी शिल्लक असलेल्या जमिनींचे वन खातीवर्ग झालेले सातबारे पुनः उघडुन त्या जमिनींचे खातेधारकानां वाटप करावे,प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सतारा,सांगली,सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे.परंतु ता प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याने या पुढे आंदोलन अधिक तीव्र करून प्रकल्प पुनर्वसन झालेले सर्व जिल्ह्यातील नागरीक २ जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन येथ पर्यंत लाँग मार्च ने धडकणार असल्याचा इशारा संघाचे उपाध्यक्ष अमोल कदम यांनी दिला आहे.