शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भिवंडी तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचं तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: June 28, 2024 17:32 IST

प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले.

भिवंडी: १९५८ मध्ये सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले.यापैकी भिवंडी तालुक्यात कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांचे आठ गावे वसविण्यात आली तर त्यानंतर कोयना व्याघ्र प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना २०१२ मध्ये पाच गावे ही सुद्धा भिवंडी तालुक्यात नव्याने वसविण्यात आलेले आहेत. या गावातील पुनर्वसन ग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या विरोधात भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्या आले.

अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे,उपाध्यक्ष अमोल कदम,सल्लगार बळीराम शिंदे,तालुका अध्यक्ष आनंद निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेली या आंदोलनात तालुक्यातील रोहीणे,निवळी,लामज,रामवाडी,करंजवडे,रवदी,चिरंबे,महाळूंगे,माडोशी,कुसापुर मोरणी,पाचगाव या गावातील असंख्य नागरीक सहभागी झाले होते.

कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनिच्या मोबदल्यात खातेदारांना पर्यायी जमीनींचे वाटप करावे, ज्या खातेदारांना अंशतः जमिनी वाटप झाल्या आहेत त्यांना उर्वरित जमिन वाटप करतांना कागदपत्रांच्या जाचक अटी रद्द करावी,प्रकल्पासाठी जमिनी संपादित करते वेळी खातेदारांव्यतिरिक्त असलेल्या पोट खातेदारांना जमीनीचे वाटप केले नसल्याने त्यांनाही पर्यायी जमीन वाटप करावे,प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या व्यतिरिक्त खातेदारांच्या जमिनी मुळ ठिकाणी शिल्लक असलेल्या जमिनींचे वन खातीवर्ग झालेले सातबारे पुनः उघडुन त्या जमिनींचे खातेधारकानां वाटप करावे,प्रकल्प बाधित व्यक्तींना शासकिय नोकरी मिळावी,पुनर्वसन गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सतारा,सांगली,सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे.परंतु ता प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याने या पुढे आंदोलन अधिक तीव्र करून प्रकल्प पुनर्वसन झालेले सर्व जिल्ह्यातील नागरीक २ जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन येथ पर्यंत लाँग मार्च ने धडकणार असल्याचा इशारा संघाचे उपाध्यक्ष अमोल कदम यांनी दिला आहे.