शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप

By धीरज परब | Updated: June 25, 2024 20:31 IST

Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

 मीरारोड - सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. प्रत्यक्षात ३५ लाख रुपये एल एन्ड ती कंपनीने दिलेले आहेत . पण गाजावाजा मात्र मुख्यमंत्र्यांनी असा केला जणू ५० लाख त्यांनी स्वतःच्या खिशातून दिले आहेत असा टोला विचारे यांनी लगावला.

नायगावच्या हद्दीत वरसावे खाडी पुलाजवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे . शाफ्टच्या कामा दरम्यान पोकलेन  चालक राकेशकुमार यादव हा २९ मे रोजी बाजूचे काँक्रीट ब्लॉक व माती कोसळून ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे .  परंतु महिना झाला तरी यादव याचा शोध शासन आणि राज्य व केंद्रातील यंत्रणांना घेता आलेला नाही . कारण यादव हा गरीब चालक असल्याने त्याचा मृतदेह काढण्यास सरकार अनुत्सुक असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी घटनास्थळी भेट देऊन केला आहे.

सोमवारी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि माजी खा . विचारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन शोधकार्याची माहिती घेतली . यावेळी एम एम आर डी अभियंता कुणाल शेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे , संपर्कप्रमुख नरेश मणेरा, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, माजी नगरसेवक प्रवीण पाटिल, उपशहर प्रमुख राजू ठाकुर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, संजय दळवी, अमोल हिंगे आदी उपस्थित होते.

राकेशकुमार यादव याचा अजून शोध लागला नसल्याने त्याच्या प्रतीक्षेत त्याची पत्नी व कुटुंबीय उघड्यावरच बसलेले होते त्यांची चतुर्वेदी व विचारे यांनी भेट घेतली . यावेळी यादव याच्या पत्नीने अश्रू अनावर होत आपली व्यथा मांडली .  यादव याच्या कुटुंबीयांना थांबण्यासाठी निदान कंटेनरची व्यवस्था करा आणि शोधकार्यची गती वाढवा अशी मागणी एमएमआरडीए कडे केली . 

यादव कुटुंबियांना ५० लाखांची मदत केल्याचा गाजावाजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवला असला तरी त्यातील केवळ ३५ लाखांचा धनादेश दिला असून तो देखील एल एन्ड टी कंपनीने केलेली मदत आहे . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिश्यातुन मदत केली आहे का ? हे सांगावे . तर विम्याचे १५ लाख रुपये अजून यादव कुटुंबियांना मिळणे बाकी असून ते त्यांना तात्काळ दिले जावे अशी मागणी विचारे यांनी केली . 

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणेrajan vichareराजन विचारे