शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आयुक्त महोदय मुंब्य्राचं वाटोळं करायला घेतलं का? आव्हाडांचं पोलीस आणि महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र

By अजित मांडके | Updated: June 13, 2023 17:12 IST

"पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला आहे."

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खरमरीत पत्र धाडले आहेत. या पत्रात एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने आपणांस हे कळविताना अत्यंत दु:ख होत आहे कि, मुंब्रा परिसराचे आपण वाटोळे करायला घेतले आहे असे दिसते. पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

गेली १४ वर्षे आम्ही दाबून ठेवले होते. पोलीस अधिकारी देखिल आम्हांला सहकार्य करायचे. ड्रग्जचा व्यवहार जवळ-जवळ बंद करण्यात आला होता. आता ड्रग्जमधून देखिल हफ्ते घ्यायला सुरुवात झाली आहे. अनधिकृत बांधकाम लक्की कंपाऊंड दुर्घटनेनंतर जवळ-जवळ बंद झाले होते. परंतु आपल्या काही अधिका-यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी आता एकेका गल्लीत २०-२० बांधकामे सुरु आहेत. मुंब्रा जेव्हा मी हातात घेतले तेव्हा पाण्याचा त्रास होता, विजेचा त्रास होता, रस्त्यांचा त्रास होता. या तिन्ही गोष्टींवर मात करुन मुंब्रा शहर हे नावारुपाला आणले. सध्या इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत तसेच त्या आपल्या निदर्शनास देखील आणून दिल्या जात आहेत. परंतु आपण त्यावर कुठलीही कारवाई करतांना दिसत नाहीत. हे खरं आहे कि, मी विरोधी पक्षातील आमदार आहे. हे देखिल खरे आहे कि, मी सरकारवर टिका करतो. म्हणून या शहराचे आपण वाटोळे करणार का? असा थेट सवालच त्यांनी या पत्राच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

शहराची आजची परिस्थिती बघता गल्ली बोळांमध्ये ड्रग्ज विकले जात आहेत. गल्ली बोळांमध्ये अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. साईटवर रिव्हॉल्वहर काढली जात आहे. मारामारीच्या घटना घडत आहेत. आता याचा पोलिसांना आणि पालिकेतील अधिकाऱ्यांना राग येणार.  पण, शेवटी हे शहर जसे होत, तसे आता राहिलेले नाही. हे शहर बदलले आहे. इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात असतील तर पाणी टंचाई उद्भवणार. ती कशी हाताळायची. रस्ते खोदले जातात ते कसे सांभाळायचे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो, रस्त्यावर घाण पसरलेली असते, कचरा पसरलेला असतो त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पण तुम्ही दोघे जबाबदार आहात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. कि, एक शहर आपण राजकारणापोटी बर्बाद करीत आहोत. या शहराचे भविष्य बर्बाद करीत आहोत. कोणितरी तुम्हांला विचारणारा असेलच आज नाहीतर उद्या. असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राPoliceपोलिस