शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

अनेक खातेधारकांमुळे भरपाई देण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:26 PM

अवकाळी पावसाचा फटका : ३२० पैकी २५ शेतकऱ्यांना मिळणार रक्कम, निधी परत जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : अवकाळी पावसामुळे शेती, भाजीपाल्याचे नुकसान झाल्याप्रकरणी महसूल विभागाने मीरा-भार्इंदरमधील ३२० शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यासाठीच्या भरपाईची साडेसात लाखांची रक्कमही मंजूर झाली. परंतु, सातबारा नोंदीत कुटुंबातील अनेकांची नावे असून त्यांची आपसात सहमती होत नसल्याने केवळ २५ एकेरी खातेधारक शेतकºयांनाच भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. तर, २९५ जणांना वंचित राहावे लागणार असून सरकारचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे मीरा-भार्इंदरमधील उत्तन, डोंगरी, तारोडी, पाली, राई, मुर्धा, मोर्वा, चेणे, काजूपाडा आदी भागांतील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. कापणी करून ठेवलेले तर काहींचे हाताशी आलेले उभे भातपीक कुजून गेले. लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. आधीच शेती, भाजीपाला लागवडीसाठी होणाºया खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही बहुतांश शेतकरी हे आपली पिढीजात शेती टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. घरच्यापुरते तरी धान्य मिळावे, या आशेने शेती करणारेही अनेक आहेत. काही जणांची शेती मालकीची नसली, तरी अनेक वर्षांपासून कसत आहेत.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी, अशी आशा शेतकºयांना वाटू लागली. त्या अनुषंगाने महसूल विभागाने पंचनामे सुरू केल्यानंतर त्यावेळीही सातबारा नोंदी असलेल्या अनेकांच्या नावांचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, तलाठ्यांनी शेती कसणाºयाचे जबाब तसेच पंच यांची नोंद घेऊन पंचनामे तयार केले. त्यामुळे निदान ३२० शेती नुकसानीचे पंचनामे झाले.या पंचनाम्यानुसार आता किमान एक हजार ते कमाल आठ हजारनुसार सात लाख ४५ हजार रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांना देण्यासाठी मंजूर झाली आहे. त्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अपर तहसीलदार कार्यालयाने पंचनामे व झालेल्या मंजुरीनुसार एकेरी खातेधारक असलेल्या २५ प्रकरणांत ४८ हजारांची नुकसानभरपाई थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, २९५ नुकसानभरपाई प्रकरणांत निधी मंजूर झाला असला, तरी सातबारा नोंदी एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने आता ही रक्कम कुणाच्या खात्यात जमा करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानभरपाई मिळवायची असल्यास अन्य खातेधारकांचे सहमतीपत्र घ्यावे लागणार आहे.सहमतीपत्रासाठी करावी लागणार कसरतबहुतांश शेतकºयांना शेतीच्या क्षेत्राच्या अनुषंगाने नुकसानभरपाईची मिळणारी रक्कम ही एक ते चार हजारांच्या घरात असेल. पण, कसणाºयास अन्य खातेधारकांची सहमतीपत्रे आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवाय, कौटुंबिक बेबनाव, वादाचे प्रकार असल्याने अशी सहमतीपत्रे मिळणे बहुतेकांना अवघड जाणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी आलेलीमदतीची सुमारे सात लाखांची रक्कम परत जाण्याची शक्यता आहे.