शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
2
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
3
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
4
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
5
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
6
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
7
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
8
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
9
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
10
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
11
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
12
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
13
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
15
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
16
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
18
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
19
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
20
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

झाडांवर डिजिटल वॉच

By admin | Published: January 06, 2017 6:16 AM

मागील वेळेची वृक्षगणना वादग्रस्त ठरल्यानंतर महापालिकेने आता पुन्हा वृक्षगणनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तो सुरू होणार आहे

ठाणे : मागील वेळेची वृक्षगणना वादग्रस्त ठरल्यानंतर महापालिकेने आता पुन्हा वृक्षगणनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तो सुरू होणार आहे. चार वर्षांपूर्वी जीआयएस आणि जीपीएस प्रणाली वापरणारी ठाणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली होती. या वेळीदेखील हेच तंत्रज्ञान वापरून वृक्षगणना केली जाणार आहे. मागील वेळेच्या वृक्षगणनेत वापरलेल्या तंत्रज्ञानापेक्षा या वेळचे तंत्रज्ञान अधिक प्रगत असून त्यात महापालिका हद्दीतील सर्वच वृक्षांवर डिजिटल वॉच राहणार असल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे. महापालिका हद्दीत नेमके किती वृक्ष आहेत, कोणत्या जातीचे आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी दर पाच वर्षांनी वृक्षगणना केली जाते. यापूर्वी २०१२ मध्ये अशा प्रकारचा सर्व्हे झाला होता. त्या वेळेस जीआयएस आणि जीपीएस प्रणालीचा वापर केला होता. परंतु, ही प्रक्रिया अत्यंत खर्चीक असल्याचे सांगून तीवर आक्षेपही घेण्यात आला होता. असे असतानादेखील पालिकेने याच पद्धतीचा अवलंब करून वृक्षगणना पूर्ण केली होती. त्यानंतर, अशा प्रकारची यंत्रणा वापरणारी महापालिका देशातील पहिली महापालिका ठरल्याचा बहुमानही मिळाला होता. दरम्यान, आता पालिकेने याच पद्धतीने वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या वेळेचे तंत्रज्ञान हे अधिक प्रगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, वृक्षगणनेसाठी निविदादेखील मागवल्या असून त्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेची निवडणूक झाल्यावर किंवा आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर वृक्षगणनेच्या कामाला सुरु वात होण्याची शक्यता आहे. नव्या तंत्रज्ञानात वृक्षांची सर्व माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदवल्यानंतर ती थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) दिसणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक झाडाचे संपूर्ण विश्लेषण प्रत्येक नागरिकाला महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. भविष्यात नकाशामधील एखादे झाड प्रत्यक्षात दिसत नसेल, गायब असेल, तर नागरिक थेट ठाणे महापालिकेमध्ये आॅनलाइन तक्र ार करता येणार आहे. विकासकाने अमुक एक वृक्ष अथवा अनेक वृक्ष कापल्याची तक्रार नेहमी महापालिकेकडे येत असते. विकासकाकडून नेहमीच ही गोष्ट अमान्य केली जाते. मात्र, या सर्व्हेनंतर आता डिजिटल नकाशा पाहून बेकायदेशीररीत्या झालेली वृक्षतोड सिद्ध करता येणार आहे. दरम्यान, चार वर्षांपूर्वी वृक्षगणनेच्या कामाला ७५ लाखांचा निधी खर्च केला होता. या वेळी तो १० लाखांनी वाढला आहे. शहरात नेमकी किती वृक्षसंख्या आहे आणि किमान हरितक्षेत्र राखण्याकरिता किती प्रमाणात वृक्षांची आवश्यकता आहे, हे पाहणे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. (प्रतिनिधी)